मटा ऑनलाइन वृत्त । जयपूर
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मागणीवर पुन्हा एकदा जोर दिला आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना आरक्षण बंद करायला हवं, त्याऐवजी सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल अशी व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे, असे वैद्य यांनी सांगितले.
अधिक काळ आरक्षण सुरू राहिलं तर त्यातून बहिष्कृतपणाची भावना फोफावेल. समाजा-समाजातील दरी वाढेल. म्हणूनच कोणत्याही देशासाठी कायमस्वरूपी आरक्षणव्यवस्था असणं हे चांगलं लक्षण नाही, असेही वैद्य यांनी पुढे स्पष्ट केले.
हिंदुत्वावरही वैद्य यांनी प्रकाश टाकला. आम्ही विविधतेचे पुरस्कर्ते आहोत. हिंदूराष्ट्रात भारतातील धार्मिक विविधतेचाही अंतर्भाव आहे, असे वैद्य म्हणाले. संविधानातील 'सेक्युलर' शब्दाच्या उल्लेखावर वैद्य यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. १९७६मध्ये संविधानात गुपचूप 'सेक्युलर' शब्द समाविष्ट करण्यात आला. हे का करण्यात आलं?, तशी कुणी मागणी केली होती का?, असा सवालच वैद्य यांनी विचारला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि काँग्रेस महाआघाडीने भाजपला चांगलेच कोंडीत पकडलं होतं. नंतर बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचाही सामना करावा लागला होता.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मागणीवर पुन्हा एकदा जोर दिला आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना आरक्षण बंद करायला हवं, त्याऐवजी सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल अशी व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे, असे वैद्य यांनी सांगितले.
अधिक काळ आरक्षण सुरू राहिलं तर त्यातून बहिष्कृतपणाची भावना फोफावेल. समाजा-समाजातील दरी वाढेल. म्हणूनच कोणत्याही देशासाठी कायमस्वरूपी आरक्षणव्यवस्था असणं हे चांगलं लक्षण नाही, असेही वैद्य यांनी पुढे स्पष्ट केले.
हिंदुत्वावरही वैद्य यांनी प्रकाश टाकला. आम्ही विविधतेचे पुरस्कर्ते आहोत. हिंदूराष्ट्रात भारतातील धार्मिक विविधतेचाही अंतर्भाव आहे, असे वैद्य म्हणाले. संविधानातील 'सेक्युलर' शब्दाच्या उल्लेखावर वैद्य यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. १९७६मध्ये संविधानात गुपचूप 'सेक्युलर' शब्द समाविष्ट करण्यात आला. हे का करण्यात आलं?, तशी कुणी मागणी केली होती का?, असा सवालच वैद्य यांनी विचारला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि काँग्रेस महाआघाडीने भाजपला चांगलेच कोंडीत पकडलं होतं. नंतर बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचाही सामना करावा लागला होता.