अ‍ॅपशहर

जम्मू-काश्मीर: जमावबंदी शिथील, इंटरनेट सुरू

जमावबंदी असल्याने गेले पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू निवळते आहे. शुक्रवारी प्रशासनाने फोन आणि इंटरनेट सेवा अंशत: सुरू केल्या. यानंतर जम्मू आणि श्रीनगरच्या बाजारात थोडी वर्दळ दिसली. लोक शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले. अनेक ठिकाणी लोक आवश्यक वस्तूंची खरेदी करत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 3:19 pm
जम्मू-काश्मीर: जमावबंदी असल्याने गेले पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू निवळते आहे. शुक्रवारी प्रशासनाने फोन आणि इंटरनेट सेवा अंशत: सुरू केल्या. यानंतर जम्मू आणि श्रीनगरच्या बाजारात थोडी वर्दळ दिसली. लोक शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले. अनेक ठिकाणी लोक आवश्यक वस्तूंची खरेदी करत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu-kashmir


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लोकांना नमाज अदा करण्यासाठी जमावबंदी शिथील केली होती. यादरम्यान, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात होती. सुरक्षा दल हाय अलर्टवर होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की जमावबंदी शिथील करण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा होता. काश्मीरी लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे पाहा, असे आदेश डोवल यांनी दिले होते.

दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात म्हटलं होतं की जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात गुरुवारी शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील कामावर रुजू होण्याचे आदेश मिळाले आहेत.

राज्यसभेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरशी संबंधित प्रस्ताव मांडण्यात आला. तत्पूर्वी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. ४ ऑगस्टपासून राज्यातील इंटरनेट आणि शाळा-कॉलेजं बंद ठेवण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज