मुजफ्फरपूर:
'भारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सीमेवर शत्रूशी लढेल आणि त्यासाठी केवळ तीन दिवसांत सैन्याची उभारणी करण्याची क्षमता संघाकडे आहे,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
मोहन भागवत मुजफ्फरपूर येथे सहा दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी जिल्हा स्कूल मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'संघ ही काही लष्करी संघटना नाही. कौटुंबिक संघटना आहे. मात्र, संघात लष्करासारखीच शिस्त आहे. सैन्य तयार करण्याची आमची क्षमता आहे. देशाला गरज भासली आणि राज्यघटनेने परवानगी दिली तर आम्ही बॉर्डरवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसत-हसत बलिदान द्यायला तयार आहेत,' असं भागवत यांनी सांगितलं.
'देशातील आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात,' असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असंही त्यांनी सांगितलं.
भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचं खच्चीकरण करणारं असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली.
'भारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सीमेवर शत्रूशी लढेल आणि त्यासाठी केवळ तीन दिवसांत सैन्याची उभारणी करण्याची क्षमता संघाकडे आहे,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
मोहन भागवत मुजफ्फरपूर येथे सहा दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी जिल्हा स्कूल मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'संघ ही काही लष्करी संघटना नाही. कौटुंबिक संघटना आहे. मात्र, संघात लष्करासारखीच शिस्त आहे. सैन्य तयार करण्याची आमची क्षमता आहे. देशाला गरज भासली आणि राज्यघटनेने परवानगी दिली तर आम्ही बॉर्डरवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसत-हसत बलिदान द्यायला तयार आहेत,' असं भागवत यांनी सांगितलं.
'देशातील आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात,' असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असंही त्यांनी सांगितलं.
भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचं खच्चीकरण करणारं असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली.