अ‍ॅपशहर

दलितांच्या घरी भोजन, संघाने झापलं

भाजप नेत्यांनी सध्या दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यावर भर दिला असला तरी भाजपचा हा एकतर्फी व्यवहार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र काही पटलेला दिसत नाही. हा प्रकार म्हणजे एकतर्फी कार्यक्रम असल्याचं सांगत संघाने भाजपला झापलं आहे. 'केवळ दलितांच्या घरी जाऊन जेवण करू नका, तर त्यांनाही तुमच्या घरी आणून त्यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद घ्या,' असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला दिला आहे.

पूनम पाण्डे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2018, 12:53 pm
नवी दिल्ली: भाजप नेत्यांनी सध्या दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यावर भर दिला असला तरी भाजपचा हा एकतर्फी व्यवहार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र काही पटलेला दिसत नाही. हा प्रकार म्हणजे एकतर्फी कार्यक्रम असल्याचं सांगत संघाने भाजपला झापलं आहे. 'केवळ दलितांच्या घरी जाऊन जेवण करू नका, तर त्यांनाही तुमच्या घरी आणून त्यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद घ्या,' असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss chief says dining wit dalits is a good initiative but we should focus on more activities with dalit community
दलितांच्या घरी भोजन, संघाने झापलं


दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अंतर्गत बैठक झाली. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा केली असून भाजपलाही कानपिचक्या दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 'अष्टमीच्या दिवशी दलित समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना कधी दलितांच्या घरी पाठवतो का?,' असा सवाल भागवत यांनी केला. 'दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला तरच समरसता अभियान यशस्वी होईल. केवळ दलितांच्या घरी जावून जेवण करून चालणार नाही. तर त्यांनाही आपल्या घरी बोलावले पाहिजे,' असंही ते म्हणाले.

'केवळ दलितांच्या घरी जेवल्याने समरसता येणार नाही. त्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. दलितांच्या घरी गेल्याने 'धन्य' झालो असं कुणाला वाटत असेल तर तो केवळ अहंकार आहे. जर कोणी स्वत:ला मोठा आणि दुसऱ्याला छोटा समजून त्याच्या घरी जेवत असेल तर त्याने समरसता कधीच येणार नाही,' असं संघाचे दिल्लीचे सह प्रांतचालक आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी 'नवभारत टाइम्स'शी बोलताना सांगितलं.

१९३० मध्ये महात्मा गांधींनी दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याचा मार्ग दाखवला होता. त्याकाळात त्याचा फायदाही झाला. मात्र आजच्या काळात आणखी काही गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. संघ स्वयंसेवकांनी दोन्ही बाजूने समरसता यावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. संघ स्वयंसेवक दलित वस्त्यांमध्ये जाऊन दलितांच्या घरी थांबतात आणि जेवतात. त्यांच्या वस्त्याही स्वच्छ ठेवतात. तसेच दलितांनाही आपल्या घरी बोलावून त्यांच्यासोबत जेवण करत असल्याचंही आलोक कुमार यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दल
पूनम पाण्डे
पूनम पाण्डे नवभारत टाइम्स में असिस्टेंट एडिटर हैं। वह बीजेपी, आरएसएस और राष्ट्रीय सुरक्षा के मामले कवर करती हैं।... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज