मेरठ (उत्तर प्रदेश) - केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेक संघ) च्या हातात आहे, असा विरोधकांचा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी खोडून काढला आहे. सरकारचा रिमोट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात नाही, असे स्पष्टीकरण सरसंघचालकांनी आज मेरठमध्ये दिले.
मोहन भागवत हे चार दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. ते आज मुरादाबाद मध्ये आल्यानंतर मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. देशातील १३० कोटी भारतीय हिंदू आहे, या वक्तव्यावरही ते ठाम राहिले. सरकारसोबत प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. आरएसएसचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. संघटना मजबूत करण्यासाठी १३० कोटी भारतीय लोक काम करीत असल्याचा पुर्नच्चार भागवत यांनी यावेळी केला. सरसंघचालकांनी आरएसएसच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना म्हटले की, देशात १३० कोटी लोकसंख्या आहे. ही सर्व जनता हिंदू आहे. या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. समाजात बदल व्हावा यासाठी चांगले काम करण्याच्या सूचना मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना दिल्या.
चांगले काम केले तर आभार आणि सन्मान मिळेल. त्यामुळे चांगले काम करा. प्रत्येक वर्गातील घटकासाठी काम करण्याचा प्रयत्न करा. त्यांना जोडण्याचे काम करा. जे लोक समाज तोडण्याचे काम करतात किंवा ज्यांचे स्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही, यासाठी काम करा. राजकारण निवडणुकीशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही गेल्या ६० वर्षा पासून संस्कृती वाचवण्यासाठी काम करीत आहोत. सरकारचा रिमोट संघाकडे नाही. आमचा सरकारशी प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे, असे भागवत म्हणाले. १०२५ साली संघाची स्थापना झाली होती. त्यावेळ मोजकेच लोक काम करीत होते. परंतु, राष्ट्र निर्माण आणि समर्पणाच्या भावनेमुळे आज संघटन मजबूत झाले आहे. आरएसएसच्या आज देशात १.३ लाख शाखा आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. भारताला विश्वगुरू बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. संघात जातीवाद, अस्पृश्यतेला थारा नाही. कोणत्याही प्रांतात कोणतीही भाषा, कोणतीही संस्कृती असो, परंतु, धर्म एकच तो म्हणजे हिंदू आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
'देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणी'
'मग राहुल गांधींना अंदमानात पाठवावं लागेल'
'केम छो, ट्रम्प'? अहमदाबादेत घुमणार आवाज
मोहन भागवत हे चार दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. ते आज मुरादाबाद मध्ये आल्यानंतर मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. देशातील १३० कोटी भारतीय हिंदू आहे, या वक्तव्यावरही ते ठाम राहिले. सरकारसोबत प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. आरएसएसचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. संघटना मजबूत करण्यासाठी १३० कोटी भारतीय लोक काम करीत असल्याचा पुर्नच्चार भागवत यांनी यावेळी केला. सरसंघचालकांनी आरएसएसच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना म्हटले की, देशात १३० कोटी लोकसंख्या आहे. ही सर्व जनता हिंदू आहे. या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. समाजात बदल व्हावा यासाठी चांगले काम करण्याच्या सूचना मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना दिल्या.
चांगले काम केले तर आभार आणि सन्मान मिळेल. त्यामुळे चांगले काम करा. प्रत्येक वर्गातील घटकासाठी काम करण्याचा प्रयत्न करा. त्यांना जोडण्याचे काम करा. जे लोक समाज तोडण्याचे काम करतात किंवा ज्यांचे स्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही, यासाठी काम करा. राजकारण निवडणुकीशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही गेल्या ६० वर्षा पासून संस्कृती वाचवण्यासाठी काम करीत आहोत. सरकारचा रिमोट संघाकडे नाही. आमचा सरकारशी प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे, असे भागवत म्हणाले. १०२५ साली संघाची स्थापना झाली होती. त्यावेळ मोजकेच लोक काम करीत होते. परंतु, राष्ट्र निर्माण आणि समर्पणाच्या भावनेमुळे आज संघटन मजबूत झाले आहे. आरएसएसच्या आज देशात १.३ लाख शाखा आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. भारताला विश्वगुरू बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. संघात जातीवाद, अस्पृश्यतेला थारा नाही. कोणत्याही प्रांतात कोणतीही भाषा, कोणतीही संस्कृती असो, परंतु, धर्म एकच तो म्हणजे हिंदू आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
'देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणी'
'मग राहुल गांधींना अंदमानात पाठवावं लागेल'
'केम छो, ट्रम्प'? अहमदाबादेत घुमणार आवाज