अ‍ॅपशहर

संघाचा हिंदू-मुस्लिमांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम विभाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने हिंदू-मुस्लिम बंधुभावासाठी एका वेगळ्याच पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच 'रक्षा बंधन' या सणाची मदत घेणार आहे. मंचच्या या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात राखी अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुस्लिम मुली हिंदू मुलांना आणि हिंदू मुली मुस्लिम मुलांना राखी बाधणार आहेत.

Maharashtra Times 25 Jul 2017, 8:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त। लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss muslim wing to use rakshabandhan to promote brotherhood
संघाचा हिंदू-मुस्लिमांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम विभाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने हिंदू-मुस्लिम बंधुभावासाठी एका वेगळ्याच पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच 'रक्षाबंधन' या सणाची मदत घेणार आहे. मंचच्या या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात राखी अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुस्लिम मुली हिंदू मुलांना आणि हिंदू मुली मुस्लिम मुलांना राखी बाधणार आहेत.

या अभियानाची सुरूवात ३ ऑगस्टपासून जयपूर येथून केली जाणार आहे. यानंतर ५ आणि ६ ऑगस्टला दिल्ली आणि लखनऊ या शहरांमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या आयोजनांमध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचचे प्रमुख इंद्रेश कुमार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम भगिनी इंद्रेश कुमार यांना देखील राखी बांधतील असे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक मोहम्मद अफजल यांनी माहिती देताना सांगितले.

लखनऊमध्ये एकूण २ कार्यक्रम होणार आहेत. यांपैकी एक कार्यक्रम पूर्णपणे दिव्यांगासाठी असणार आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुभावाची भावना वाढीस लावून गंगा-जमुना संस्कृतीचे रक्षण करणे हाच या कार्यक्रमाचा एकमात्र उद्देश आहे असे अफजल यांनी सांगितले. मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे देशभरातील १२ राज्यांमध्ये हे अभियान चालवण्याची तयारी केली गेली असल्याचेही ते म्हणाले.

रक्षाबंधन ७ ऑगस्टला आहे. मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरात हे अभियान चालवले जाणार असल्याचेही अफजल म्हणाले. आम्ही एकत्रितपणे सण साजरे करत आलो आहोत. यापूर्वी देखील अनेक प्रसंगी मुस्लिम बंधूंनी हिंदू भगिनींचे रक्षण करण्याचे काम केले आहे असेही ते म्हणाले.

२ ऑगस्टला बकरी ईद आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी गोहत्या करू नये, कारण यामुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावतात असे आवाहन आम्ही मुस्लिमांना केले असल्याचेही अफजल यांनी सांगितले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज