अ‍ॅपशहर

या तीन तरुण चेहऱ्यांनी काँग्रेसचं आसन हादरवलं

काँग्रेस एकानंतर एक राज्य गमावत असताना पक्षातील तरुण नेतेही साथ सोडत असल्याचं चित्र आहे. इशान्य भारतात काँग्रेसचा सुपडासाफ करण्यासाठी काँग्रेसमधील नेत्यानेच मदत केली. तर मध्य प्रदेशातही हेच चित्र दिसून आलं. आता राजस्थानमध्ये काँग्रेससमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2020, 1:48 pm
नवी दिल्ली : सर्वात जुना पक्ष काँग्रेसकडे अनेक राज्यात असा एक चेहरा आहे, ज्याचं संपूर्ण राज्यात वर्चस्व आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट हे असंच एक नाव आहे. सचिन पायलट यांनी अंतर्गत संघर्षातून काँग्रेसविरोधात बंडाचं हत्यार उपसलं आहे. काँग्रेसमधील युवा चेहऱ्याने बंडाचं हत्यार उपसण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केला आणि यासोबतच काँग्रेसला मध्य प्रदेशातील सत्तेतून पायउतारही व्हावं लागलं. तिकडे इशान्य भारतातही हेमंत बिस्वा शर्मा हा असाच एक चेहरा होता, ज्याचा इशान्येतील राज्यात प्रभाव होता. पण हा दिग्गज नेताही भाजपच्या गळाला लागला आणि इशान्यकडे काँग्रेसला उतरती कळा लागली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin pilot jyotiraditya scindia hemant biswas sharma how young leaders damaged congress
या तीन तरुण चेहऱ्यांनी काँग्रेसचं आसन हादरवलं


सचिन पायलट भाजपत जाणार नाहीत; 'हे' मोठे पाऊल उचण्याची शक्यता

सचिन पायलट - काँग्रेसची तोफ

राजस्थानमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी सचिन पायलट यांनी गेल्या चार वर्षांपासून तळागाळापर्यंत काम केलं. पण जेव्हा सत्ता आली, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे चिरंजिव असलेले सचिन पायलट वयाच्या २६ व्या वर्षी खासदार झाले. तर ३५ व्या वर्षी केंद्रीय कॅबिनेटमध्ये जागा मिळवली. वयाच्या ३७ व्या वर्षी पक्षाने राजस्थानची धुरा त्यांच्याकडे दिली. ही जबाबदारी सार्थ ठरवत त्यांनी सत्ताही मिळवली. पण अखेर पक्षाकडून त्यांचं समाधान करण्यात आलं नाही.

राजस्थान: गहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

ज्योतिरादित्य शिंदे - काँग्रेसला मध्य प्रदेशात हादरा

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला मोठा हादरा दिला. त्यांनी समर्थक आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला आणि काँग्रेसला मध्य प्रदेशातील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर २००१ ला त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि गुना मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत संसद गाठली. २००७ मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिपद मिळालं. २०१८ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली. पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करणं काँग्रेसला चांगलंच महागात पडलं.

राजस्थानातील काँग्रेस सरकारमागे 'साडेसाती' लावणारे ते ७ प्रसंग

हेमंत बिस्वा शर्मा - इशान्येतील चाणक्य

इशान्येतील राजकारणातील चाणक्य हेमंत बिस्वा शर्मा यांनी भाजपच्या इशान्येतील वाढीत अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलंय. थेट काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोच असणारे हेमंत बिस्वा शर्मा यांनी अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्यामागेही नाराजी हेच कारण होतं. २०१६ मध्ये त्यांनी राहुल गांधींवर जहरी टीका करत निवडणूक लढवली आणि कॅबिनेट मंत्री बनले. भाजप नेतृत्त्वाने हेमंत बिस्वा शर्मा यांना NEDA म्हणजेच इशान्य लोकशाही आघाडीचं संयोजक म्हणून नेमलं, ज्यात इशान्य राज्यतील पक्षांचा सहभाग आहे.

rajasthan Live: १०९ आमदारांच्या पाठिंब्याचा मुख्यमंत्री गहलोत यांचा दावा

इशान्येकडील राज्यात हेमंत बिस्वा शर्मा भाजपसाठी संकटमोचक ठरले. इशान्य भारतातील राजकारण आपलं अस्तित्व नसलेल्या भाजपने आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांसारख्या राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ केला. एवढंच नव्हे, हेमंत बिस्वा शर्मा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पश्चिम बंगालच्या राजकारणातही मोठी भूमिका निभावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज