बाबरी पतन गांधी हत्येपेक्षाही गंभीर: ओवेसी
'बाबरी मशीद पतन ही घटना गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असे ट्विट एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. २४ वर्षे उलटून गेली तरी बाबरी मशीद खटला प्रलंबित असल्याबद्दलही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली.
Maharashtra Times 19 Apr 2017, 10:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद
'बाबरी मशीद पतन ही घटना गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असे ट्विट एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. २४ वर्षे उलटून गेली तरी बाबरी मशीद खटला प्रलंबित असल्याबद्दलही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली.
बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १३ नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवण्याचे निर्देश दिले. याबाबत ओवेसी यांनी एक ट्विट करून गांधी हत्येपेक्षा हा खटला अधिक गंभीर असल्याचं म्हटलं आहे.
Gandhis killers where convicted hanged & Babri accused have been made Union Ministers,conferred Padma Vibhushan ,justice system moves slowly — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 19, 2017
'महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला दोन वर्षांत पूर्ण झाला आणि बाबरी मशीद पतन खटल्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. हा खटला गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असं ट्विट ओवेसी यांनी केलं आहे. 'महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्यात आली मात्र बाबरी पतनातील आरोपींना केंद्रीय मंत्रिपदाचा मान दिला जात आहे. पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे. न्यायदानाची प्रक्रिया संथगतीने चालली आहे', असेही ओवेसी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
Mahatma Gandhi assassination trial completed in 2 years & Babri Masjid demolition which more serious than MK Gandhi killing not yet decided — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 19, 2017
'बाबरी मशीद पतन ही घटना गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असे ट्विट एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. २४ वर्षे उलटून गेली तरी बाबरी मशीद खटला प्रलंबित असल्याबद्दलही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली.
बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १३ नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवण्याचे निर्देश दिले. याबाबत ओवेसी यांनी एक ट्विट करून गांधी हत्येपेक्षा हा खटला अधिक गंभीर असल्याचं म्हटलं आहे.
Gandhis killers where convicted hanged & Babri accused have been made Union Ministers,conferred Padma Vibhushan ,justice system moves slowly — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 19, 2017
'महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला दोन वर्षांत पूर्ण झाला आणि बाबरी मशीद पतन खटल्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. हा खटला गांधी हत्येपेक्षाही गंभीर आहे', असं ट्विट ओवेसी यांनी केलं आहे. 'महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्यात आली मात्र बाबरी पतनातील आरोपींना केंद्रीय मंत्रिपदाचा मान दिला जात आहे. पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे. न्यायदानाची प्रक्रिया संथगतीने चालली आहे', असेही ओवेसी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
Mahatma Gandhi assassination trial completed in 2 years & Babri Masjid demolition which more serious than MK Gandhi killing not yet decided — Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 19, 2017