अ‍ॅपशहर

सरदार सरोवर धरणामुळे चार राज्यांचा विकास : मोदी

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकामात अनेक अडथळे आले. अपप्रचार करण्यात आला. जागतिक बँकेने कर्ज दिले नाही, पण गुजरातची मंदिरे त्यासाठी पुढे आली. गुजरातच्या संत-महंतांची हे धरण होण्यात खूप महत्त्वाची भूमिका आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्ण झालेल्या या धरणामुळे केवळ गुजरातचाच नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांचाही विकास होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Maharashtra Times 17 Sep 2017, 2:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । दाभोई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sardar sarovar dam faced so many obstacles but we were determined that the project will go on says pm modi
सरदार सरोवर धरणामुळे चार राज्यांचा विकास : मोदी


सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकामात अनेक अडथळे आले. अपप्रचार करण्यात आला. जागतिक बँकेने कर्ज दिले नाही, पण गुजरातची मंदिरे त्यासाठी पुढे आली. गुजरातच्या संत-महंतांची हे धरण होण्यात खूप महत्त्वाची भूमिका आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्ण झालेल्या या धरणामुळे केवळ गुजरातचाच नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांचाही विकास होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बहुप्रतीक्षित सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी यांच्या वाढदिवसाच्याच दिवसाचा मुहूर्त साधून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मोदी बोलत होते. 'पाण्याचा स्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर कोणत्याही ठिकाणच्या विकासाला खीळ बसते. मी मुख्यमंत्री असताना पाहिलंय की इथे सीमेवरच्या जवानांनादेखील पाण्याची समस्या भेडसवायची. आम्ही नर्मदेचं पाणी सीमेपर्यंत जवानांसाठी आणलं.'

भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीचं स्मरण केलं. आज जर सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर हे धरम ६०-७० च्या दशकातच तयार झालं असतं, असं मोदी म्हणाले. हे धरण इंजिनीअरिंगचा एक उत्कृष्ठ नमूना असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज