नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (rajiv gandhi assassination) यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जी पेरारिवलन (perarivalan ) याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिले.राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पेरारिवलन ३० वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले होते की, जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही त्याची सुटका करू. त्याच प्रमाणे आज न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले.
वाचा-ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी; मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी निलिनी श्रीहरन, मरुगन आणि श्रीलंकन नागरिकासह अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणात ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्र सरकारने आरोपींच्या दया याचिकांवर ११ वर्ष निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय घेतला होता.
वाचा- ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग पाचूचे?; जाणून घ्या इतिहास
तामिळनाडू राज्य सरकारने पेरारिवलनची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता. केंद्र सरकारच्या मते दया याचिकेवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे, असे केंद्राने न्यायालयात म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्राला विचारणा केली होती की, तुरुंगात जास्ती जास्त कालावधी पूर्ण केलेल्यांना सोडले जात असताना केंद्र यावर सहमती का दर्शवत नाही.
तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे २१ मे १९९१ रोजी एका निवडणुक रॉलीत आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटकांनी उडवले होते. यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.
वाचा-ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी; मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी निलिनी श्रीहरन, मरुगन आणि श्रीलंकन नागरिकासह अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणात ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्र सरकारने आरोपींच्या दया याचिकांवर ११ वर्ष निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय घेतला होता.
वाचा- ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग पाचूचे?; जाणून घ्या इतिहास
तामिळनाडू राज्य सरकारने पेरारिवलनची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता. केंद्र सरकारच्या मते दया याचिकेवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे, असे केंद्राने न्यायालयात म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्राला विचारणा केली होती की, तुरुंगात जास्ती जास्त कालावधी पूर्ण केलेल्यांना सोडले जात असताना केंद्र यावर सहमती का दर्शवत नाही.
तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे २१ मे १९९१ रोजी एका निवडणुक रॉलीत आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटकांनी उडवले होते. यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.