अ‍ॅपशहर

जम्मूमधून संचारबंदी उठवली, उद्या शाळा उघडणार

गेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू आहे. आज फक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये उद्या सुरू होणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 7:25 pm
जम्मू: गेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू आहे. आज फक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये उद्या सुरू होणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu


जम्मू जिल्ह्याच्या डेप्युटी मॅजिस्ट्रेट सुषमा चौहान यांनी जम्मूमधील संचारबंदी आणि जमावबंदी उठवली आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहे. या आदेशानुसार शनिवार १० ऑगस्टपासून जम्मूतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था सुरू होतील. त्याआधी सकाळी प्रशासनाने जिल्ह्यातील संचारबंदी शिथील केली होती. दरम्यान, राज्यसभेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयक मांडण्यात आलं होतं. तत्पूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण काश्मीर खोऱ्यात मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. ४ ऑगस्टपासून राज्यातील इंटरनेट आणि शाळा-कॉलेजं बंद ठेवण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज