वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मुंबईत अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनिल शुक्ला सहा वर्षांनंतर एनआयएच्या सेवेतून पुन्हा दिल्ली पोलिस सेवेत परतले आहेत. सहा वर्षांच्या काळात त्यांनी जम्मू्-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची आर्थिक रसद, पुलवामा हल्ला आदी महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास निर्णायक टप्प्यावर असताना झालेल्या या बदलीने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शुक्ला हे १९९६च्या बॅचचे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्र शासित प्रदेशांच्या केडरचे अधिकारी आहेत. सहा वर्षे ते एनआयएमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. हा कालावधी सोमवारी पूर्ण झाल्याने ते दिल्ली पोलिसांत पुन्हा रुजू होणे अपेक्षित आहे.
सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे तपास हाताळले. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद, बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर झालेली दगडफेक यासारख्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांचा तपास त्यांनी हाताळला आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तपास त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. या प्रकरणात २०२०मध्ये १९ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हे सारे आरोपी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.
प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण होण्याआधी मुंबईत वादग्रस्त सचिन वाझे प्रकरणाचा तपास त्यांच्या हाती सोपवण्यात आला होता. वाझे यांना अटक करण्यापासून ते तपास शेवटाला आणण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी ते मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, आता त्यांची बदली झाल्याने या तपासाच्या पुढील गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'शुक्लांच्या बदलीची चौकशी करा'
एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केला आहे. शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यामागे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करीत या बदलीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एनआयएने आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून त्यात सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शुक्ला यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना सहा वर्षे पूर्ण झाली होती. या संपूर्ण प्रकरणापूर्वीच त्यांची बदली होणार होती. पण त्यात काही काळ मुदतवाढ दिली गेली होती. आता त्यांची अचानक बदली करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केला आहे. शुक्ला यांनी परमबीर सिंह यांना मुख्य आरोपी केले हे केंद्राला मान्य नसावे. परमबीर माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत, याची आज खात्री झाली, अशा शब्दांत त्यांनी शुक्ला यांच्या बदलीबाबत संशय व्यक्त करत भाजपवर टीका केली.
मुंबईत अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनिल शुक्ला सहा वर्षांनंतर एनआयएच्या सेवेतून पुन्हा दिल्ली पोलिस सेवेत परतले आहेत. सहा वर्षांच्या काळात त्यांनी जम्मू्-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची आर्थिक रसद, पुलवामा हल्ला आदी महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास निर्णायक टप्प्यावर असताना झालेल्या या बदलीने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे तपास हाताळले. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद, बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर झालेली दगडफेक यासारख्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांचा तपास त्यांनी हाताळला आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तपास त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. या प्रकरणात २०२०मध्ये १९ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हे सारे आरोपी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.
प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण होण्याआधी मुंबईत वादग्रस्त सचिन वाझे प्रकरणाचा तपास त्यांच्या हाती सोपवण्यात आला होता. वाझे यांना अटक करण्यापासून ते तपास शेवटाला आणण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी ते मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, आता त्यांची बदली झाल्याने या तपासाच्या पुढील गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'शुक्लांच्या बदलीची चौकशी करा'
एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केला आहे. शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यामागे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करीत या बदलीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एनआयएने आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून त्यात सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शुक्ला यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना सहा वर्षे पूर्ण झाली होती. या संपूर्ण प्रकरणापूर्वीच त्यांची बदली होणार होती. पण त्यात काही काळ मुदतवाढ दिली गेली होती. आता त्यांची अचानक बदली करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केला आहे. शुक्ला यांनी परमबीर सिंह यांना मुख्य आरोपी केले हे केंद्राला मान्य नसावे. परमबीर माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत, याची आज खात्री झाली, अशा शब्दांत त्यांनी शुक्ला यांच्या बदलीबाबत संशय व्यक्त करत भाजपवर टीका केली.