नवी दिल्ली : केंद्र व राज्य सरकारांकडून करोना संसर्ग रोखण्याचे कसोशीचे प्रयत्न होत असूनही रुग्णांच्या व मृतांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत देशभरात ७,४६६ करोनाबाधितांची भर पडली असून एकूण करोनाबाधितांचा आकडा १,६५,७९९वर पोहोचला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. दिवसभरात एवढ्या संख्येने करोनाबाधित वाढण्याचे हे सर्वोच्च प्रमाण आहे. या कालावधीत १७५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४,७०६वर पोहोचली आहे.
दिवसभरात साडेसात हजार रुग्ण
केंद्र व राज्य सरकारांकडून करोना संसर्ग रोखण्याचे कसोशीचे प्रयत्न होत असूनही रुग्णांच्या व मृतांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2020, 4:00 am