नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची नावे जाहीर केली असून, यात उत्तर प्रदेशातील १६ आणि महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, नागपूरमधून नाना पटोले, प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात मोरादाबादमधून राज बब्बर, कानपूरमध्ये श्रीप्रकाश जैस्वाल, बहराइचमधून सावित्रीबाई फुले आणि सुलतानपूरमधून संजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदे, पटोले यांना काँग्रेसची उमेदवारी
काँग्रेसने बुधवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची नावे जाहीर केली असून, यात उत्तर प्रदेशातील १६ आणि महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश ...
MT 14 Mar 2019, 4:00 am