नवी दिल्ली:
६५० कोटी रुपयांचा कथित कर्जघोटाळा करणाऱ्या 'शिर्डी इंडस्ट्रीज'शी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचं 'कनेक्शन' असल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला. या ट्विटमध्ये ''शिरडी के चमत्कारों'की कोई 'सीमा' ही नहीं'' असा उल्लेख राहुल यांनी केल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. या ट्विटवर साईबाबा संस्थान ट्रस्टनं (Shri Saibaba Sansthan Trust) आक्षेप घेतला आहे. भावना दुखावणारं ट्विट केल्यानं राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली आहे.
'राहुलजी, राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला ओढणं दुर्दैवी आहे. त्यामुळं देश-विदेशातील साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व साईभक्तांच्या वतीनं मी त्याचा निषेध करतो. अवमानकारक ट्विट केल्यानं राहुल यांनी माफी मागावी,' अशी मागणी सुरेश हावरे यांनी ट्विटद्वारे केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीयूष गोयल हे २५ एप्रिल २००८ ते १ जुलै २०१० या कालावधीत 'शिर्डी इंडस्ट्रीज'चे अध्यक्ष आणि संचालक होते. याच कालावधीत कंपनीनं बँकाकडून २५८.६२ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. गोयल यांनी नंतर कंपनीच्या पदांचा राजीनामा दिला होता. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर थकीत कर्जापैकी काही रक्कम माफ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तसंच गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
६५० कोटी रुपयांचा कथित कर्जघोटाळा करणाऱ्या 'शिर्डी इंडस्ट्रीज'शी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचं 'कनेक्शन' असल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला. या ट्विटमध्ये ''शिरडी के चमत्कारों'की कोई 'सीमा' ही नहीं'' असा उल्लेख राहुल यांनी केल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. या ट्विटवर साईबाबा संस्थान ट्रस्टनं (Shri Saibaba Sansthan Trust) आक्षेप घेतला आहे. भावना दुखावणारं ट्विट केल्यानं राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली आहे.
'राहुलजी, राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला ओढणं दुर्दैवी आहे. त्यामुळं देश-विदेशातील साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व साईभक्तांच्या वतीनं मी त्याचा निषेध करतो. अवमानकारक ट्विट केल्यानं राहुल यांनी माफी मागावी,' अशी मागणी सुरेश हावरे यांनी ट्विटद्वारे केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीयूष गोयल हे २५ एप्रिल २००८ ते १ जुलै २०१० या कालावधीत 'शिर्डी इंडस्ट्रीज'चे अध्यक्ष आणि संचालक होते. याच कालावधीत कंपनीनं बँकाकडून २५८.६२ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. गोयल यांनी नंतर कंपनीच्या पदांचा राजीनामा दिला होता. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर थकीत कर्जापैकी काही रक्कम माफ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तसंच गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.