नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपतींना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त मी शिवाजी महाराजांना नमन करतो. त्यांच्यासारखा राजा आपल्या देशात जन्मला ही भाग्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते व त्यांच्याठायी असाधारण प्रशासकीय कौशल्य होते, असे मोदी म्हणाले. महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करीत असून त्यांना अभिमान वाटेल, असा देश आम्ही घडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही छत्रपतींना ट्विटरवरून आदरांजली अर्पण केली.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही छत्रपतींना ट्विटरवरून आदरांजली अर्पण केली.