अ‍ॅपशहर

मुस्लिमांना तिकीट द्यायला हवे होतेः राजनाथ

राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील उमेदवारांच्या तिकीट वाटपावर वक्तव्य करत सावध भूमिका मांडली आहे.

Maharashtra Times 23 Feb 2017, 9:24 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shouldve fielded some muslims in up rajnath
मुस्लिमांना तिकीट द्यायला हवे होतेः राजनाथ


राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील उमेदवारांच्या तिकीट वाटपावर वक्तव्य करत सावध भूमिका मांडली आहे. 'उत्तर प्रदेशात भाजपने मुस्लिम उमेदवारांना तिकीट द्यायला हवे होते', असं ते म्हणाले.

'इतर अनेक राज्यांमध्ये आम्ही मुस्लिम उमेदवारांना तिकीटं दिली आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेशातही तोच कित्ता गिरवायला हवा होता. मी तिथे नव्हतो. पण जे माहिती आहे त्या आधारावर बोलतोय. एखाद्यावेळेस निवडणूक जिंकणारे उमेदवार न मिळाल्याने संसदीय मंडळाने त्यांना तिकीट दिले नसावे असंही होऊ शकतं. मात्र, मुस्लिमांना तिकीट द्यायलाच हवे होते', असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

'राज्याच्या निवड समितीला जिंकण्या योग्य मुस्लिम उमेदवार मिळाले नसतील, असंही शक्य आहे. पण मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले असते तर त्यामुळे कुठलेही नुकसान झाले नसते. या पुढे अल्पसंख्याक उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्न करू. कारण उत्तर प्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या २० टक्के आहे. पण भाजपने तिकीट वाटप करताना जाती-धर्माच्या आधारावर नाही तर निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेवर केले आहे', असं राजनाथ सिंह म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज