अ‍ॅपशहर

'दहशतवाद्यांनो, हिंमत असेल तर समोर या', काश्मिरी पंडित तरुणीचे आव्हान

काश्मीरमधील दहशतवाद्यांना एका तरुणीने आव्हान दिलं आहे. दहशतवाद्यांनी माखनलाल बिंद्रू या काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या केली. त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रू हिने दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2021, 1:02 am
श्रीनगरः काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी ९० मिनिटांच्या आत तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्यामध्ये इकबाल पार्क परिसरातील श्रीनगरच्या प्रसिद्ध फार्मसीचे मालक माखनलाल बिंद्रू या काश्मिरी पंडिताचा समावेश होता. दुकानात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. माखनलाल बिंद्रू यांच्यावर आज अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shraddha bindroo challenges terrorist who killed her pharmacist ml bindroo
'दहशतवाद्यांनो, हिंमत असेल तर समोर या', काश्मिरी पंडित तरुणीचे आव्हान


दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. वडिलांच्या हत्येनंतर मुलगी श्रद्धा बिंद्रूने दहशतवाद्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांनो समोर येऊन बोला, माझ्या वडिलांनी मला हेच शिकवले. नेत्यांनी तुमच्या हाती बंदुका आणि दगडं दिली आहेत. तुम्ही याच्याने लढाल, हा भ्याड हल्ला आहे. तुम्ही पाठीमागून गोळ्या झाडू शकता. या पेक्षा वेगळं काय करणार तुम्ही? तुम्ही त्यांना संपलं, पण मी त्यांची मुलगी आहे, असं म्हणत श्रद्धा बिंद्रूने दहशतवाद्यांना आव्हान दिलं.

ते माखनलाल बिंद्रू कधीच मरणार नाहीत, तुम्ही फक्त त्यांच्या शरीराचा वध केला आहे आणि मी हिंदू असूनही कुराण देखील वाचले आहे आणि कुराण म्हणते की हा चोला (शरीर) बदलेल, पण त्यांचे विचार तसेच राहतात. माखनलाल बिंद्रू एक आत्मा म्हणून जिवंत असतील. ते काम करत असताना त्यांना ज्याने कोणी गोळ्या घातल्या, जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने माझ्यासमोर यावं आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावं, असं ती म्हणाली.

railway employees : खूशखबर! रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट; मिळणार 'इतक्या' दिवसांचा बोनस

ते एक चांगले व्यक्ती होते. त्यांनी काश्मीर आणि काश्मिरीयतची सेवा केली. त्याचे शरीर गेले पण त्याचा आत्मा अजूनही जिवंत आहे. एक दिवस प्रत्येकजण मरणार आहे. आपल्याला अल्लाह, देव आणि गुरु नानक यांना उत्तर द्यावे लागेल. ज्याने हे केलं तो नरकातच जाणार. ही काश्मीरची लढाई नाही. कारण काश्मीरची सेवा करणाऱ्या व्यक्तीची तुम्ही हत्या केली आहे. ही कुठली आली काश्मीरची लढाई?, असा सवाल तिने दहशतवाद्यांना केला आहे.

ajay kumar mishra meets amit shah : लखीमपूर प्रकरणामुळे अजय मिश्रांचे मंत्रिपद धोक्यात? सूत्रांनी दिली माहिती

बिंदू ही काश्मिरी पंडित आहे. १९९० च्या दशकात जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद उफाळल्यानंतर हजारो काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केले. पण काही काश्मिरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये आहेत. माखनलाल बिंद्रू हे त्या काश्मिरी पंडितांपैकी एक होते.

महत्वाचे लेख