नवी दिल्ली: मूळची पालघरची रहिवासी असलेल्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा २८ वर्षीय प्रियकर आफताब अमीन पुनावालानं निर्घृणपणे हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी ३०० लीटरचा फ्रिज आणला. या फ्रिजमधून रोज रात्री २ वाजता तो एक तुकडा काढायचा आणि जवळच असलेल्या जंगलात फेकून द्यायचा. दक्षिण दिल्लीत असलेल्या महरौलीत श्रद्धा आणि आफताबनं एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. याच फ्लॅटमध्ये ते लिव्ह-इनमध्ये राहत होते.
बऱ्याच दिवसांपासून श्रद्धाची ख्यालीखुशाली न समजल्यानं श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर चिंतेत होता. त्यानं ही बाब श्रद्धाचे वडील विकास वालकर यांना सांगितली. त्यानंतर विकास यांनी वसई पोलीस ठाणं गाठलं. २६ ऑक्टोबरला पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं. आम्ही दिल्लीच्या मेहरुली परिसरातील छतरपूरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहायचो. २२ मे रोजी आमचं भांडण झालं. त्यानंतर आम्ही फ्लॅट सोडल्याचं आफताबनं पोलिसांना सांगितलं.
दिल्लीत फ्लॅट भाड्यानं घेतल्यानंतरच्या दोनच आठवड्यांत आफताबनं श्रद्धाची निर्घृण हत्या केली. त्यानं मृतदेहाची अत्यंत चलाखीनं विल्हेवाट लावली. श्रद्धा केवळ तिचा फोन घेऊन निघून गेली. तिने तिचे कपडे आणि इतर वस्तू मागेच ठेवले, अशी माहिती आफताबनं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचं लोकेशन आणि कॉल्सचा तपशील काढला.
२२ ते २६ मे च्या दरम्यान श्रद्धाच्या बँक खात्यातून आफताबच्या खात्यात बँकिंग ऍपच्या माध्यमातून ५४ हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यावेळी तिचं लोकेशन छतरपूर होतं. याच भागात दोघे राहत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. कारण आपण २२ मेपासून श्रद्धाच्या संपर्कात नव्हतो, अशी माहिती आफताबनं आधीच पोलिसांना दिली होती.
यानंतर पोलिसांनी आफताबला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा आपणच श्रद्धाच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात पैसे वळवले. कारण मला तिचे पासवर्ड माहीत होते, असं आफताबनं सांगितलं. आफताबनं श्रद्धाच्या क्रेडिट कार्डची बिल्सदेखील भरली. बँकेचे अधिकारी तिच्या मुंबईतील घरी जाऊ नये आणि आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आफताबनं बिल्स भरली होती.
आफताब श्रद्धाचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता. तिच्या मित्र मैत्रिणींशी चॅट करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. ३१ मे रोजी श्रद्धाच्या अकाऊंटवरुन चॅटिंग झालं होतं. त्यावेळी तिचं लोकेशन पुन्हा एकदा मेहरुलीच होतं. यानंतर वसई पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली आणि संपूर्ण गुन्हा उघडकीस आला. श्रद्धा तुला २२ मे रोजी सोडून गेली होती. तर मग तिचं लोकेशन मेहरुली कसं होतं? असा प्रश्न पोलिसांनी विचारला आणि आफताब चपापला. त्यानंतर त्यानं संपूर्ण घटनाक्रम कथन करत पोलिसांकडे हत्येची कबुली दिली.
बऱ्याच दिवसांपासून श्रद्धाची ख्यालीखुशाली न समजल्यानं श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर चिंतेत होता. त्यानं ही बाब श्रद्धाचे वडील विकास वालकर यांना सांगितली. त्यानंतर विकास यांनी वसई पोलीस ठाणं गाठलं. २६ ऑक्टोबरला पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं. आम्ही दिल्लीच्या मेहरुली परिसरातील छतरपूरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहायचो. २२ मे रोजी आमचं भांडण झालं. त्यानंतर आम्ही फ्लॅट सोडल्याचं आफताबनं पोलिसांना सांगितलं.
दिल्लीत फ्लॅट भाड्यानं घेतल्यानंतरच्या दोनच आठवड्यांत आफताबनं श्रद्धाची निर्घृण हत्या केली. त्यानं मृतदेहाची अत्यंत चलाखीनं विल्हेवाट लावली. श्रद्धा केवळ तिचा फोन घेऊन निघून गेली. तिने तिचे कपडे आणि इतर वस्तू मागेच ठेवले, अशी माहिती आफताबनं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचं लोकेशन आणि कॉल्सचा तपशील काढला.
२२ ते २६ मे च्या दरम्यान श्रद्धाच्या बँक खात्यातून आफताबच्या खात्यात बँकिंग ऍपच्या माध्यमातून ५४ हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यावेळी तिचं लोकेशन छतरपूर होतं. याच भागात दोघे राहत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. कारण आपण २२ मेपासून श्रद्धाच्या संपर्कात नव्हतो, अशी माहिती आफताबनं आधीच पोलिसांना दिली होती.
यानंतर पोलिसांनी आफताबला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा आपणच श्रद्धाच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात पैसे वळवले. कारण मला तिचे पासवर्ड माहीत होते, असं आफताबनं सांगितलं. आफताबनं श्रद्धाच्या क्रेडिट कार्डची बिल्सदेखील भरली. बँकेचे अधिकारी तिच्या मुंबईतील घरी जाऊ नये आणि आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आफताबनं बिल्स भरली होती.
आफताब श्रद्धाचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता. तिच्या मित्र मैत्रिणींशी चॅट करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. ३१ मे रोजी श्रद्धाच्या अकाऊंटवरुन चॅटिंग झालं होतं. त्यावेळी तिचं लोकेशन पुन्हा एकदा मेहरुलीच होतं. यानंतर वसई पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली आणि संपूर्ण गुन्हा उघडकीस आला. श्रद्धा तुला २२ मे रोजी सोडून गेली होती. तर मग तिचं लोकेशन मेहरुली कसं होतं? असा प्रश्न पोलिसांनी विचारला आणि आफताब चपापला. त्यानंतर त्यानं संपूर्ण घटनाक्रम कथन करत पोलिसांकडे हत्येची कबुली दिली.