अ‍ॅपशहर

लॉकडाउनदरम्यान किती स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला? अखेर सरकारने जाहीर केला आकडा

लॉकडाउनमुळे हजारो स्थलांतरीत मजूर अडकून पडले होते. यानंतर केंद्र सरकारने मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या. या ट्रेनमधेही अनेक मजुरांचा मृत्यू झाला. याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2020, 7:17 pm
नवी दिल्लीः लॉकडाउन दरम्यान किती स्थलांतरी मजुरांचा मृत्यू झाला? सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यू संदर्भात कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचं उत्तर सरकारने देताच विरोधक आणखी आक्रमक झाले होते. यानंतर सरकारला शुक्रवारी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये किती स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला? या प्रश्नावर राज्यसभेत सरकारने उत्तर दिलं. ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ९७ जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, असं सरकारने सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shramik special train
लॉकडाउनदरम्यान किती स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला? अखेर सरकारने जाहीर केला आकडा ( file photo )


तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला होता. ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ९७ स्थलांतरीत मजुरांचा प्रवासादरम्यान स्पेशल ट्रेनमध्ये मृत्यू झाला आहे. या ९७ मृतांपैकी ८७ मृतदेह राज्य पोलिसांकडून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत संबंधित राज्य पोलिसांकडून ५१ पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आले आहेत. यात ह्रदय विकाराचा झटका, हृदयरोग, मेंदूत रक्तस्राव, फुफ्फुस आणि यकृताच्या आजाराची कारणं देण्यात आली आहेत, अशी माहिती रेल्वे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलीय.

पत्रकार निघाला घरभेदी! चिन्यांना गोपनीय माहिती पुरवली, प्रत्येकवेळी १ हजार डॉलर घ्यायचा

यापूर्वी मे महिन्यात ८० स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये ९ मे ते २९ मे दरम्यान ८० स्थालांतरीत मजुरांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या माहितीवरून देण्यात आली होती.

एनआयएचे छापे, केरळ आणि बंगालमधून अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक

करोना व्हायरसच्या संकटानंतर देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. या काळात स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल झाले. लाखो स्थलांतरित मजूर रस्त्यावर आले होते. यावेळी अनेकांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर आल्या. या विषयावर सोमवारी संसदेत सरकारला प्रश्न विचारला गेला. पण यासंदर्भात कुठलीही माहिती नसल्याचं सरकारनं सोमवारी सांगितलं होतं. लॉकडाउन दरम्यान जवळपास ८० कोटी नागरिकांना अतिरिक्त रेशन दिलं गेलं. ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, असं सरकारने सांगितलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज