विलास अध्यापक, बेळगाव
साप दिसला की भल्याभल्यांची बोबडी वळते. लगेच लोकांना बोलावून त्याला मारल्यावरच सुटकेचा नि:श्वास सोडतात; पण एक महिला कोणाच्या घरी, शेतात, दुकानात, अंगणात साप आलाय असा केवळ निरोपाचा फोन आला की, तातडीने तेथे जाऊन त्या सापाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊन अलगद पकडून पुन्हा सुरक्षितस्थळी जंगलात सोडून देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. या आहेत बेळगावातील निर्झरा चिठ्ठी.
साप विषारी असो वा बिनविषारी, त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडून सापाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे कार्य महिला सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी करत आहेत. बेळगावातील एकमेव महिला सर्पमित्र म्हणून त्यांची आज सर्वत्र ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती आनंद चिठ्ठी हेसुद्धा सर्पमित्र आहेत. पतीपासून प्रेरणा घेऊन निर्झरा यांनी साप पकडायला प्रारंभ केला. पतीमुळेच त्यांना सापाच्या विविध जाती आणि विषारी, बिनविषारी सापांविषयी माहिती झाली. नंतर निर्झरा यांनी साप पकडायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १५१० साप पकडून सुरक्षितस्थळी सोडले आहेत.
निर्झरा यांना लग्न होईपर्यंत सापांची खूप भीती वाटायची; पण लग्नानंतर पती आनंद यांच्यासमवेत साप पकडायला जाऊ लागल्यावर त्यांनी सापाविषयी शास्त्रीय माहिती घ्यायला सुरुवात केली आणि भीती निघून गेली. सापाविषयी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून, सर्प आणि मानवातील गैरसमजुतीची दरी दूर करणे आपले ध्येय असल्याचे निर्झरा यांनी सांगितले.
निर्झरा यांचे पती आनंद यांनी आजपर्यंत पंधरा हजारांहून अधिक साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. पतीने वाचविलेल्या सापांमध्ये निर्झरा यांचाही सिंहाचा वाटा आहे. निर्झरा यांनी स्वतः १५१० साप पकडले आहेत. मे २०१५ मध्ये एकाच दिवशी १३ साप पकडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. महिला असूनही रात्री-अपरात्री साप वाचविण्यासाठी त्या जातात. सर्प पकडणे, त्यांना सोडणे, जखमी सापावर उपचार, सर्पविषयक व्याख्यान, गंभीर सर्पदंशावेळी पतीच्या पाठीशी निर्झरा यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. साप पकडण्याबरोबर प्रतिष्ठित सामाजिक संस्थांतून कार्य निर्झरा करत आहेत. त्यांना बाइक रायडिंगचा छंदही आहे. यू ट्युबवरील त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी लाभली आहे. महिला सर्पमित्र म्हणून देशात सर्वाधिक लोकप्रियता त्यांना मिळाली आहे. आज त्या अनेक महिला आणि तरुणींचे प्रेरणास्थान बनल्या आहेत.
फिल्म इंडस्ट्री आणि मॉडेलिंगसाठीही त्यांना ऑफर्स आल्या आहेत. त्यांचा मुलगा भगतसिंग आणि मुलगी निआसा यांनादेखील त्यांनी सापांविषयी माहिती दिली असून, मुलेही उत्तमरीत्या साप हाताळतात.
साप पकडण्यात एक टक्का रिस्क असते. आपण वाचलो तर साप वाचणार, ही भावना साप पकडताना मनात असते.
कोट...
नाग, मण्यार आणि घोणस हे विषारी साप पकडणे आव्हान असते. सापाला केव्हाही प्रेमाने पकडावे. घर, विहीर आणि झुडूपात साप पकडणे धोकादायक असते. कारण तेथे बचावाला जागा नसते. वनविभाग, पर्यावरणप्रेमी, सर्प संशोधक व सरकार यांची मदत झाल्यास ९० टक्के सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील.
निर्झरा चिठ्ठी, सर्पमित्र
साप दिसला की भल्याभल्यांची बोबडी वळते. लगेच लोकांना बोलावून त्याला मारल्यावरच सुटकेचा नि:श्वास सोडतात; पण एक महिला कोणाच्या घरी, शेतात, दुकानात, अंगणात साप आलाय असा केवळ निरोपाचा फोन आला की, तातडीने तेथे जाऊन त्या सापाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊन अलगद पकडून पुन्हा सुरक्षितस्थळी जंगलात सोडून देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. या आहेत बेळगावातील निर्झरा चिठ्ठी.
साप विषारी असो वा बिनविषारी, त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडून सापाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे कार्य महिला सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी करत आहेत. बेळगावातील एकमेव महिला सर्पमित्र म्हणून त्यांची आज सर्वत्र ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती आनंद चिठ्ठी हेसुद्धा सर्पमित्र आहेत. पतीपासून प्रेरणा घेऊन निर्झरा यांनी साप पकडायला प्रारंभ केला. पतीमुळेच त्यांना सापाच्या विविध जाती आणि विषारी, बिनविषारी सापांविषयी माहिती झाली. नंतर निर्झरा यांनी साप पकडायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १५१० साप पकडून सुरक्षितस्थळी सोडले आहेत.
निर्झरा यांना लग्न होईपर्यंत सापांची खूप भीती वाटायची; पण लग्नानंतर पती आनंद यांच्यासमवेत साप पकडायला जाऊ लागल्यावर त्यांनी सापाविषयी शास्त्रीय माहिती घ्यायला सुरुवात केली आणि भीती निघून गेली. सापाविषयी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून, सर्प आणि मानवातील गैरसमजुतीची दरी दूर करणे आपले ध्येय असल्याचे निर्झरा यांनी सांगितले.
निर्झरा यांचे पती आनंद यांनी आजपर्यंत पंधरा हजारांहून अधिक साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. पतीने वाचविलेल्या सापांमध्ये निर्झरा यांचाही सिंहाचा वाटा आहे. निर्झरा यांनी स्वतः १५१० साप पकडले आहेत. मे २०१५ मध्ये एकाच दिवशी १३ साप पकडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. महिला असूनही रात्री-अपरात्री साप वाचविण्यासाठी त्या जातात. सर्प पकडणे, त्यांना सोडणे, जखमी सापावर उपचार, सर्पविषयक व्याख्यान, गंभीर सर्पदंशावेळी पतीच्या पाठीशी निर्झरा यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. साप पकडण्याबरोबर प्रतिष्ठित सामाजिक संस्थांतून कार्य निर्झरा करत आहेत. त्यांना बाइक रायडिंगचा छंदही आहे. यू ट्युबवरील त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी लाभली आहे. महिला सर्पमित्र म्हणून देशात सर्वाधिक लोकप्रियता त्यांना मिळाली आहे. आज त्या अनेक महिला आणि तरुणींचे प्रेरणास्थान बनल्या आहेत.
फिल्म इंडस्ट्री आणि मॉडेलिंगसाठीही त्यांना ऑफर्स आल्या आहेत. त्यांचा मुलगा भगतसिंग आणि मुलगी निआसा यांनादेखील त्यांनी सापांविषयी माहिती दिली असून, मुलेही उत्तमरीत्या साप हाताळतात.
साप पकडण्यात एक टक्का रिस्क असते. आपण वाचलो तर साप वाचणार, ही भावना साप पकडताना मनात असते.
कोट...
नाग, मण्यार आणि घोणस हे विषारी साप पकडणे आव्हान असते. सापाला केव्हाही प्रेमाने पकडावे. घर, विहीर आणि झुडूपात साप पकडणे धोकादायक असते. कारण तेथे बचावाला जागा नसते. वनविभाग, पर्यावरणप्रेमी, सर्प संशोधक व सरकार यांची मदत झाल्यास ९० टक्के सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील.
निर्झरा चिठ्ठी, सर्पमित्र