अ‍ॅपशहर

दिल्ली: शाहीन बागमध्ये हिंसाचाराचा कट; आपचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अडथळे निर्माण करण्यासाठी काही राजकीय पक्ष 'अशांतता किंवा हिंसाचार' घडवू शकतात, असा दावा आम आदमी पक्षानं केला आहे. तसं पत्र आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगानं पाठवलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 10:42 am
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत अडथळे निर्माण करण्यासाठी काही राजकीय पक्ष 'अशांतता किंवा हिंसाचार' घडवू शकतात, असा दावा आम आदमी पक्षानं केला आहे. तसं पत्र आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगानं पाठवलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या शाहीन बाग आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये रविवारी अशांतता पसरवण्याचा कट रचला जात आहे, असा दावाही पक्षानं केला आहे. हा कट उधळून लावण्यासाठी दिल्ली पोलीस आणि अन्य यंत्रणांना आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले जावेत, अशीही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kejriwal


CAA: नागपाड्यातील महिलांचे आंदोलन सुरूच

शाहीन बागमध्ये गोळीबार; हल्लेखोराला अटक

आम आदमी पक्षानं निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवलं असून, दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि निवडणुकीत अडथळे निर्माण करण्यासाठी काही समाजविघातक घटक आणि काही राजकीय संघटना संगनमत करून अशांतता आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचत आहेत, असा दावा केला आहे. या पत्राबरोबर त्यांनी व्हिडिओही पाठवला आहे. काही लोक सरिता विहारच्या जवळ एकत्र मोठ्या संख्येनं जमा होण्याचं आवाहन करत असल्याचं त्यात दिसतं. दिल्लीच्या निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचा कट रचला जात आहे असा आम्हाला संशय आहे, असंही आपनं म्हटलं आहे.

शाहीन बाग आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तेथे रविवारी हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही आपनं केला आहे. हा कट उधळून लावण्यासाठी आणि आवश्यक पावलं उचलण्यासाठी दिल्ली पोलीस आणि विविध यंत्रणांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही आपनं पत्राद्वारे निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज