हेलिकॉप्टर सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा इटलीतील न्यायालयाचा निकाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर सौद्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस तसेच माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा करण्यात येत आहे. इटलीच्या एका न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालात हा खुलासा झाला असल्याचे म्हटले जात आहे. मोदी सरकारने इटलीतील भारतीय दूतावासाकडून या निकालाची माहिती मागितली आहे.
यूपीए सरकारच्या काळात भारताने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर सौद्यात इटलीच्या कोर्ट ऑफ मिलान या न्यायालयाने २२५ पानी निकालात हेलिकॉप्टर बनविणाऱ्या फिनमेक्कानिका कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी या मुद्यावर भाष्य करण्यास नकार दिला. या विषयावर लोकसभेत चर्चा होणार असून सभागृहाबाहेर आपण काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सोनिया गांधी, मनमोहन सिंग, अहमद पटेल तसेच ऑस्कर फर्नांडिस तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या नावांचा निकालपत्रात उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नावांचा निकालपत्रात उल्लेख असला तरी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पुरावा देण्यात आलेला नाही.
भारताने २०१०मध्ये इटलीकडून १२ महागडी हेलिकॉप्टर विकत घेतली होती. तब्बल ३ हजार ५६५ कोटी रुपयांच्या या व्यवहाराची बोलणी २००५ ते २००७ या कालावधीत सुरू होती. या दरम्यान त्यागी हे भारतीय हवाईदलाचे प्रमुख होते. या प्रकरणी आम्ही चौकशीचे आदेश दिले होते आणि हे कंत्राट रद्द केले होते. जर भाजप सरकारला त्यात स्वारस्य असेल तर त्यांनी आम्ही दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशावर कारवाई करावी, असे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी म्हटले आहे.
भाजप आक्रमक, संसदेत मुद्दा तापणार
या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आणि लाच देण्यात आल्याचे अँटनी यांनी मान्य केले होते. लाच देणाऱ्यांना शिक्षा देण्यात आली असून लाच घेणाऱ्यांचे काय, असा सवाल केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. या प्रकरणी यथावकाश बरेच काही उघड होईल, असे प्रसाद म्हणाले. आज, बुधवारी भाजपकडून हा मुद्दा लोकसभेत पुन्हा उपस्थित केला जाणार आहे, राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामी या मुद्याकडे लक्ष वेधणार आहेत.
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर सौद्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस तसेच माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा करण्यात येत आहे. इटलीच्या एका न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालात हा खुलासा झाला असल्याचे म्हटले जात आहे. मोदी सरकारने इटलीतील भारतीय दूतावासाकडून या निकालाची माहिती मागितली आहे.
यूपीए सरकारच्या काळात भारताने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर सौद्यात इटलीच्या कोर्ट ऑफ मिलान या न्यायालयाने २२५ पानी निकालात हेलिकॉप्टर बनविणाऱ्या फिनमेक्कानिका कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी या मुद्यावर भाष्य करण्यास नकार दिला. या विषयावर लोकसभेत चर्चा होणार असून सभागृहाबाहेर आपण काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सोनिया गांधी, मनमोहन सिंग, अहमद पटेल तसेच ऑस्कर फर्नांडिस तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या नावांचा निकालपत्रात उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नावांचा निकालपत्रात उल्लेख असला तरी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पुरावा देण्यात आलेला नाही.
भारताने २०१०मध्ये इटलीकडून १२ महागडी हेलिकॉप्टर विकत घेतली होती. तब्बल ३ हजार ५६५ कोटी रुपयांच्या या व्यवहाराची बोलणी २००५ ते २००७ या कालावधीत सुरू होती. या दरम्यान त्यागी हे भारतीय हवाईदलाचे प्रमुख होते. या प्रकरणी आम्ही चौकशीचे आदेश दिले होते आणि हे कंत्राट रद्द केले होते. जर भाजप सरकारला त्यात स्वारस्य असेल तर त्यांनी आम्ही दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशावर कारवाई करावी, असे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी म्हटले आहे.
भाजप आक्रमक, संसदेत मुद्दा तापणार
या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आणि लाच देण्यात आल्याचे अँटनी यांनी मान्य केले होते. लाच देणाऱ्यांना शिक्षा देण्यात आली असून लाच घेणाऱ्यांचे काय, असा सवाल केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. या प्रकरणी यथावकाश बरेच काही उघड होईल, असे प्रसाद म्हणाले. आज, बुधवारी भाजपकडून हा मुद्दा लोकसभेत पुन्हा उपस्थित केला जाणार आहे, राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामी या मुद्याकडे लक्ष वेधणार आहेत.