अ‍ॅपशहर

सोनिया गांधीच अध्यक्षपदावर राहणार

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावल्यानंतर काँग्रेसने आता आपली भूमिका बदलली असून, पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहतील, असे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी शुक्रवारी पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स 26 Oct 2019, 7:37 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावल्यानंतर काँग्रेसने आता आपली भूमिका बदलली असून, पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहतील, असे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी शुक्रवारी पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonia gandhi will remain in office
सोनिया गांधीच अध्यक्षपदावर राहणार


काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविषयी विनाकारण चिंता करू नका. काँग्रेस पुन्हा राखेतून झेपावत आहे, असेही अँटनी सांगायला विसरले नाहीत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे सोपविण्यात आली होती. त्या वेळी 'ही तात्पुरती, कामचलाऊ व्यवस्था' असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मात्र, आता काँग्रेसची ही भूमिका बदलली असून, पक्षाची इच्छा असेल, तोपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदावर राहतील, असे अँटनी पत्रकार परिषदेत म्हणाले.

के. सी. वेणुगोपाळ, रणदीपसिंह सुरजेवाला, जयराम रमेश हेही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सोनिया गांधी आजारी आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र-हरियाणामध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणूक पुरेशा गांभीर्याने लढल्या गेल्या नाहीत. 'सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग प्रशस्त करावा,' असा प्रश्न अँटनी यांना विचारण्यात आला होता. त्यावर 'सोनिया गांधी आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत त्या अध्यक्षपदावर कायम राहतील. संपूर्ण काँग्रेस पक्षाने एकमुखाने केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले आहे. त्यांना आणि पक्षाला वाटेल तोपर्यंत त्या अध्यक्षपदी कायम राहतील,' असे अँटनी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा पराभव झाला तर तो सोनिया आणि राहुल गांधींमुळे आणि काँग्रेसचा विजय झाला तर तो परिस्थितीमुळे, असे म्हणणे दुटप्पीपणाचे आहे, असेही अँटनी म्हणाले. राहुल गांधींविषयीही चिंता बाळगू नका, ते पण अधिक ताकदीने परततील,असेही अँटनी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज