अ‍ॅपशहर

'त्यांची' नियतच चांगली नव्हती: मनमोहन बोलले

२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपला घेरलं आहे. या कथित घोटाळ्यात आरोपांचा सामना करावा लागलेले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

Maharashtra Times 21 Dec 2017, 1:27 pm
नवी दिल्ली: २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपला घेरलं आहे. या कथित घोटाळ्यात आरोपांचा सामना करावा लागलेले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'माझ्या सरकारविरोधात भयंकर अपप्रचार करण्यात आला. बिनबुडाचे आरोप करण्यात आले. पण आरोप करणाऱ्यांची नियत चांगली नव्हती, हे आता सिद्ध झालंय,' असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spectrum scam a massive propaganda was unleashed against my goverment says manmohan singh
'त्यांची' नियतच चांगली नव्हती: मनमोहन बोलले


देशभरात गाजलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा निकाल आज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिला. माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या कन्या कनीमोळी यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष सुटका केली. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हे प्रकरण उजेडात आले होते. त्यामुळं मनमोहन सरकारची मोठी बदनामी झाली. काँग्रेस सरकारनं हे आरोप फेटाळले होते. मात्र, घोटाळ्याच्या कथित आकड्यांमुळं कुणीही काँग्रेसचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

मनमोहन सिंग यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आमच्या सरकारवरील सर्व आरोप निराधार असल्याचं यामुळं स्पष्ट झालं आहे,' असं मनमोहन म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज