बेंगळुरू:
कर्नाटकातील बेंगळुरूच्या इंदिरा कँटीनमधून गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते आतापर्यंत जवळपास २० लाख रुपये किंमतीची ताटं आणि चमचे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यात १ लाख २० हजार चमचे आणि दहा हजार ताटांचा समावेश आहे. सामान चोरीला जात असल्यानं कँटीन चालकानं गिऱ्हाइकांना चमचे आणि ताटं देणंच बंद केलं आहे.
कँटीनमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करावेत किंवा चमचे आणि ताटं गायब करू नका, असं आवाहन करण्यात यावं, अशा विनंतीचं पत्र चालकांनी बेंगळुरू महापालिकेला पाठवलं आहे. मात्र, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात पालिकेनं नकार दिला आहे. कँटीन चालवण्यास घेतलेल्या शेफटॉक या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बाबू पुजारी यांनी सांगितलं की, 'कँटीनमधून ८० हजारांहून अधिक चमचे चोरीला गेले आहेत. कँटीन सुरू झाली त्यावेळी महापालिकेनं ४०० चमचे प्रत्येक कँटीनला दिले होते. पण सुरुवातीच्या काही दिवसांतच त्यातील अर्धे चमचे चोरीला गेले. आम्हाला प्रत्येक कँटीनसाठी ३०० चमचे खरेदी करावे लागले. त्यातील काही चमचे चोरीला गेले आहेत. एक चमचा १५ रुपयांना मिळतो. आमचं जवळपास १२ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.'
ग्राहकांना वाइट वाटत असल्यानं आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही. आम्ही सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. एका ग्राहकाला चमचा खिशात ठेवताना पाहिलं. त्याबाबत विचारणा केली असता त्यानं आणि इतरांनीही कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळं पोलिसांकडेही तक्रार केली नाही.
कर्नाटकातील बेंगळुरूच्या इंदिरा कँटीनमधून गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते आतापर्यंत जवळपास २० लाख रुपये किंमतीची ताटं आणि चमचे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यात १ लाख २० हजार चमचे आणि दहा हजार ताटांचा समावेश आहे. सामान चोरीला जात असल्यानं कँटीन चालकानं गिऱ्हाइकांना चमचे आणि ताटं देणंच बंद केलं आहे.
कँटीनमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करावेत किंवा चमचे आणि ताटं गायब करू नका, असं आवाहन करण्यात यावं, अशा विनंतीचं पत्र चालकांनी बेंगळुरू महापालिकेला पाठवलं आहे. मात्र, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात पालिकेनं नकार दिला आहे. कँटीन चालवण्यास घेतलेल्या शेफटॉक या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बाबू पुजारी यांनी सांगितलं की, 'कँटीनमधून ८० हजारांहून अधिक चमचे चोरीला गेले आहेत. कँटीन सुरू झाली त्यावेळी महापालिकेनं ४०० चमचे प्रत्येक कँटीनला दिले होते. पण सुरुवातीच्या काही दिवसांतच त्यातील अर्धे चमचे चोरीला गेले. आम्हाला प्रत्येक कँटीनसाठी ३०० चमचे खरेदी करावे लागले. त्यातील काही चमचे चोरीला गेले आहेत. एक चमचा १५ रुपयांना मिळतो. आमचं जवळपास १२ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.'
ग्राहकांना वाइट वाटत असल्यानं आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही. आम्ही सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. एका ग्राहकाला चमचा खिशात ठेवताना पाहिलं. त्याबाबत विचारणा केली असता त्यानं आणि इतरांनीही कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळं पोलिसांकडेही तक्रार केली नाही.