अ‍ॅपशहर

काश्मीरमधील २७ शाळा 'श्री श्री' पुन्हा बांधणार

जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारादरम्यान समाजकंटकांनी जाळलेल्या २७ शाळा पुन्हा बांधून देण्याची तयारी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी दाखवली आहे.

Maharashtra Times 4 Nov 2016, 11:48 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri sri ravi shankar offer to rebuild the 27 schools burnt in kashmir
काश्मीरमधील २७ शाळा 'श्री श्री' पुन्हा बांधणार


जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारादरम्यान समाजकंटकांनी जाळलेल्या २७ शाळा पुन्हा बांधून देण्याची तयारी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी दाखवली आहे.

रविशंकर यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. दहशतवादी बुरहान वाणी चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात २७ शाळांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळं या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविशंकर यांनी या शाळा पुन्हा उभारण्याचं ठरवलं आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे बिहार व काश्मीरमधील प्रतिनिधी संजयकुमार सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजय कुमार सिंह हे लवकरच आगीत खाक झालेल्या शाळांची पाहणी करणार असून त्याचा अहवाल सादर करणार आहेत. येत्या २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीत काश्मिरी नेत्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. रविशंकर यावेळी काश्मिरी नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, असंही सांगण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज