श्रीनगर : निर्बंध उठविल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील शाळा सोमवारी सुरू झाल्या. शाळांमध्ये शिक्षक उपस्थित होते. मात्र, विद्यार्थ्यांनी बहुतांश शाळांकडे पाठ फिरवली. श्रीनगरमधील अंदाजे १९० शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. काश्मीर खोऱ्यात अद्यापही तणावाचे वातावरण असल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयात सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत 'कलम ३७०' हटविल्यानंतर तणावपूर्ण असलेल्या काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहेत. द्रमुकच्या नेतृत्वाखाली माकप, तृणमूल, इंडियन युनियन मुस्लिम लीग यांसह विविध विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत.