अ‍ॅपशहर

लाल किल्ल्यावरून मोदींनी पाकला फटकारले

पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जेव्हा निरागस, निष्पाप मुलांचा जीव गेला तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू दाटले. संसद भावुक झाली. येथल्या शाळकरी मुलांवर त्या घटनेचा आघात झाला. ही आमच्यातील मानवता आहे. हाच आमचा स्वभाव आहे, पण काही देश मात्र अशा घटनांनंतरही दहशतवादाला खतपाणी घालत आहेत, असे नमूद करत 'दहशतवाद पोसणाऱ्या देशांची गय केली जाणार नाही', असा इशारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.

Maharashtra Times 15 Aug 2016, 11:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम strong message for pakistan in pm modis independence day speech
लाल किल्ल्यावरून मोदींनी पाकला फटकारले


पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जेव्हा निरागस, निष्पाप मुलांचा जीव गेला तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. संसद भावुक झाली. येथल्या शाळकरी मुलांवर त्या घटनेचा आघात झाला. ही आमच्यातील मानवता आहे. हाच आमचा स्वभाव आहे, पण काही देश मात्र अशा घटनांनंतरही दहशतवादाला खतपाणी घालत आहेत, असे नमूद करत 'दहशतवाद पोसणाऱ्या देशांची गय केली जाणार नाही', असा इशारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारताची मानवता आणि पाकिस्तानचा दहशतवाद जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान म्हणाले, माणुसकीच्या संस्कारात वाढलेला देश आणि दहशतवादासोबत वाढलेला देश कसा असतो, याचे वास्तव मला सांगायचं आहे. पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी मुलांना लक्ष्य केले. तेव्हा त्या हल्ल्याची वेदनेने आम्ही अस्वस्थ झालो मात्र दुसरीकडे जिथे घटना घडली तो देश दहशतवादाचाच आसुरी आनंद घेताना दिसतोय. दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेल्यास हा देश त्याचा पुरस्कारच करतो. हाच आमच्या आणि त्यांच्याचला फरक असून जे मानवतेवर विश्वास ठेवतात त्यांनी हे दोन्ही स्वभाव तागडीत जोकून पाहावेत, असे आवाहन मोदींनी केले.

पंतप्रधांनांनी यावेळी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचेही आभार मानले. मी तिथे प्रत्यक्ष गेलेलो नाही मात्र त्यांनी मी घेतलेल्या भूमिकेबद्दल जे आभार व्यक्त केले आहेत ती बाब देशासाठी मोठ्या सन्मानाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी आम्हाला शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत, असेही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले.

हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीचं एन्काउंटर आणि त्यानंतर काश्मिरात उसळलेला हिंसाचार याचा उल्लेख न करता दहशतवादाला कोणत्याही स्थितीत थारा दिला जाणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

दहशतवादाबरोबरच नक्षलवादावरही पंतप्रधान बोलले. हिंसाचार आणि अत्याचाराला भारताच्या लोकशाहीत कोणतेही स्थान नाही. खाद्यावर बंदूक ठेऊन निर्दोष लोकांना मारले जात असेल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. अशा प्रवृत्तींपुढे झुकणार नाही, असे मोदींनी ठणकावून सांगितले. जे युवक नक्षलवादाच्या वाटेवर चालले आहेत त्यांनी माघारी फिरावे. आपल्या आई-वडिलांच्या आशा-अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज