लखनऊ: भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा नेहरू-गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची फाईल बाजूला सारत 'भारतरत्न' पुरस्कारासाठी स्वत: च्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.
रविवारी ऊस उत्पादन संस्थेच्या सभागृहात आयोजित 'मालवीय आणि हिंदुत्व' या विषयावर आयोजित परिसंवादात सुब्रमण्यम स्वामी यांनी हा दावा केला. 'चंद्रशेखर सरकारच्या काळात सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याबाबत झालेली चर्चा मी ऐकली आहे. मंत्री म्हणून पुरस्कार देण्याबाबतची प्रक्रियाही पाहिली आहे. नेहरुंनी स्वत:लाच भारतरत्न घेतला होता,' असं ते म्हणाले. नेहरू केंब्रिज विद्यापीठात नापास झाले होते. सोनिया गांधी यांनीही केंब्रिजमधून पदवी घेतल्याचा खोटा दावा केला होता. नेहरू-गांधी घराण्यातून आजपर्यंत कोणीच पदवी मिळवू शकला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
'संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर नेहरुंनी शेख अब्दुल्लांना डॉ. आंबेडकरांकडे पाठविले होते. संविधानात कलम ३७० ठेवण्याची विनंती अब्दुल्ला यांनी आंबेडकरांना केली होती. पण आंबेडकरांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर नेहरुंनी हे काम पटेलांकडे सोपविले होते. आंबेडकरांनी पटेलांचा मान ठेवला. पण नोटीफिकेशन देऊन राष्ट्रपती ३७० कलम केव्हाही हटवू शकतात, अशी अट त्यांनी संविधानात घातली,' असं स्वामी म्हणाले. 'लोक मला विचारतात ३७० कलम कधी हटवलं जाईल. अजून निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, थोडी कळ सोसा, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे,' असंही ते म्हणाले.
रविवारी ऊस उत्पादन संस्थेच्या सभागृहात आयोजित 'मालवीय आणि हिंदुत्व' या विषयावर आयोजित परिसंवादात सुब्रमण्यम स्वामी यांनी हा दावा केला. 'चंद्रशेखर सरकारच्या काळात सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याबाबत झालेली चर्चा मी ऐकली आहे. मंत्री म्हणून पुरस्कार देण्याबाबतची प्रक्रियाही पाहिली आहे. नेहरुंनी स्वत:लाच भारतरत्न घेतला होता,' असं ते म्हणाले. नेहरू केंब्रिज विद्यापीठात नापास झाले होते. सोनिया गांधी यांनीही केंब्रिजमधून पदवी घेतल्याचा खोटा दावा केला होता. नेहरू-गांधी घराण्यातून आजपर्यंत कोणीच पदवी मिळवू शकला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
'संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर नेहरुंनी शेख अब्दुल्लांना डॉ. आंबेडकरांकडे पाठविले होते. संविधानात कलम ३७० ठेवण्याची विनंती अब्दुल्ला यांनी आंबेडकरांना केली होती. पण आंबेडकरांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर नेहरुंनी हे काम पटेलांकडे सोपविले होते. आंबेडकरांनी पटेलांचा मान ठेवला. पण नोटीफिकेशन देऊन राष्ट्रपती ३७० कलम केव्हाही हटवू शकतात, अशी अट त्यांनी संविधानात घातली,' असं स्वामी म्हणाले. 'लोक मला विचारतात ३७० कलम कधी हटवलं जाईल. अजून निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, थोडी कळ सोसा, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे,' असंही ते म्हणाले.