चेन्नई:
राजकारण हे क्षेत्र माझ्यासाठी नवे नाही. थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच मोठा विजय आहे, असे सांगत येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात 'एन्ट्री' करणार आहे, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी जाहीर केले.
चेन्नईत आजपासून ते चाहत्यांशी संवाद साधत आहेत. राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हसन आणि 'द बॉस' रजनीकांत राजकारणात 'धमाकेदार एन्ट्री' करणार अशी अनेक वर्षांपासून चर्चा आहे. त्यांनी राजकीय वक्तव्ये केली किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात 'आवाज' उठवला तरी त्यांच्या चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा दक्षिणेत सुरू होते. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी राजकीय एन्ट्री केल्यानंतर 'थलैवा' म्हणून प्रसिद्ध असलेले रजनीकांत राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळाला आहे. अखेर त्यांच्याही राजकारणातील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी आज चेन्नईत जाहीर केले. 'राजकारण माझ्यासाठी नवे नाही. पण थोडा उशीर झाला आहे. माझा प्रवेशच मोठा विजय आहे, असे ते म्हणाले.
राजकारण हे क्षेत्र माझ्यासाठी नवे नाही. थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच मोठा विजय आहे, असे सांगत येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात 'एन्ट्री' करणार आहे, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी जाहीर केले.
चेन्नईत आजपासून ते चाहत्यांशी संवाद साधत आहेत. राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हसन आणि 'द बॉस' रजनीकांत राजकारणात 'धमाकेदार एन्ट्री' करणार अशी अनेक वर्षांपासून चर्चा आहे. त्यांनी राजकीय वक्तव्ये केली किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात 'आवाज' उठवला तरी त्यांच्या चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा दक्षिणेत सुरू होते. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी राजकीय एन्ट्री केल्यानंतर 'थलैवा' म्हणून प्रसिद्ध असलेले रजनीकांत राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळाला आहे. अखेर त्यांच्याही राजकारणातील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी आज चेन्नईत जाहीर केले. 'राजकारण माझ्यासाठी नवे नाही. पण थोडा उशीर झाला आहे. माझा प्रवेशच मोठा विजय आहे, असे ते म्हणाले.