अ‍ॅपशहर

जल्लिकट्टूच्या मैदानात रजनीकांत, रेहमान

जल्लिकट्टूसाठी तामिळनाडूमध्ये सुरू झालेले आंदोलन दिवसागणिक तीव्र होत असून आता दाक्षिणात्य सेलिब्रिटींनीही त्यात उडी घेतली आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, त्यांचा अभिनेता जावई धनुष, संगीतकार ए. आर. रेहमान, क्रिकेटपटू आर. अश्विन यांच्यासह बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Maharashtra Times 20 Jan 2017, 2:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme court delays jallikattu verdict by a week on govts request
जल्लिकट्टूच्या मैदानात रजनीकांत, रेहमान


जल्लिकट्टूसाठी तामिळनाडूमध्ये सुरू झालेले आंदोलन दिवसागणिक तीव्र होत असून आता दाक्षिणात्य सेलिब्रिटींनीही त्यात उडी घेतली आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, त्यांचा अभिनेता जावई धनुष, संगीतकार ए. आर. रेहमान, क्रिकेटपटू आर. अश्विन यांच्यासह बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे, साउथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन अर्थात, 'नादीगर संगम' या तामिळी कलाकारांच्या संघटनेनंही जल्लिकटूच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जल्लिकट्टूच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. ही बंदी उठवून जल्लिकट्टूला परवानगी मिळावी या मागणीसाठी तामिळनाडूत गेल्या दोन दिवसांपासून मोठी आंदोलनं सुरू आहेत. आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अभिनेता कमल हसन यानं सर्वात आधी जल्लिकट्टूला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर रजनीकांत, संगीतकार ए. आर. रेहमान, बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, क्रिकेटपटू आर. अश्विन, अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर हेही जल्लिकट्टूच्या बाजूनं उतरले आहेत. ए. आर. रहमान यानं एक दिवसाचं उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जल्लिकट्टू दोन दिवसांत होईलः मुख्यमंत्री

येत्या एक-दोन दिवसात जल्लिकट्टूचे आयोजन केलं जाईल, असं सांगून तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी आंदोलन मागे घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. राज्य सरकार वटहुकूम काढेल, असं त्यांनी म्हटलं आहे. वटहुकुमाचा प्रस्ताव तयार आहे. तो केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. यानंतर केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवेल, असं सेल्वम म्हणाले.

सुनावणी पुढे ढकलली!

दुसरीकडे जल्लिकट्टू प्रकरणावर किमान एक आठवड्यापर्यंत निकाल टाळावा अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत सुनावणी लांबणीवर टाकली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज