अ‍ॅपशहर

supriya sule : सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, 'महाराष्ट्र झुकेगा नही..., PM मोदींचे वक्तव्य धक्कादायक'

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राज्य सरकारने देशात करोना संसर्ग पसरवण्याचे मोठे पाप केले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2022, 12:06 pm
नवी दिल्ली : महाराष्ट्रालाबद्दल पंतप्रधान मोदी असं का बोलले? याचं वाईटत वाटतंय. आपल्याला वेदना झाल्या. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा उल्लेख कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी हे भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत. पण करोना कुणी पसवरला याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. पंतप्रधान मोदींवर आम्ही नाराज नाही, पण हैराण आहोत. आमच्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं का बोलले? राज्यांमध्ये द्वेष का पसरवताय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( supriya sule ) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supriya sule reaction on pm modi speech in lok sabha over covid 19 india
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, 'महाराष्ट्र झुकेगा नही..., PM मोदींचे वक्तव्य धक्कादायक'


करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स या गुजरातमधून धावल्या. महाराष्ट्रातूनही श्रमिक ट्रेन्स चालवल्या गेल्या. श्रमिक ट्रेन्स महाराष्ट्राने नाही, तर केंद्राने सोडल्या. रेल्वे केंद्र सरकारच्या आखत्यारित येते. ट्रेन्सचा निर्णय केंद्र सरकार घेतं. आमच्याकडे रेल्वे नाही. आमच्याकडे एसटी आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रबद्दल असं वक्तव्य केल्याने दुःख होतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी जे काही बोलले ते दुर्दैवी आहे. त्यांच्या पक्षातील नेते काहीही पसरवत आहेत. श्रमिक ट्रेन्स सोडल्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेचे आभार मानले होते. करोना संकटाच्या काळात प्रत्येक श्रमिकाला त्याच्या घरी पोहोचवण्याचे काम आम्ही केले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

sanjay raut : स्थलांतरीत मजुरांवरील PM मोदींच्या वक्तव्यावरून राऊतांचा निशाणा, 'हा महाराष्ट्रातील... '

पंतप्रधान मोदींनी फक्त यूपी आणि पंजाबचेच का नाव घेतले? याचं विशेष वाटतं. पण या करोना संकटाच्या काळात आपण माणुसकी विसरलो? इतकी आपली पातळी घसरली? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. सातत्याने महाराष्ट्राबद्दल द्वेष पसरवला जातोय. महाराष्ट्राच्या प्रकल्पांवर विकास योजनांवर अन्याय होतोय. पण महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

migrant workers : केजरीवाल यांचा योगींवर निशाणा, 'गंगेत मृतदेह वाहत होते आणि हे...'

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

देशात लॉकडाउनचा पालन केलं जात असताना मुंबईतून यूपी आणि बिहारच्या स्थलांतरीत मजुरांना हाकलण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काँग्रेसने रेल्वेची मोफत तिकिटं दिली आणि देशात करोनाचा संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसने हे मोठे पाप केले आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सोमवारी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज