इस्लामाबाद:
भारताच्या लढाऊ विमानांनी एका ऑपरेशनच्या वेळी चार बॉम्ब फेकले असा दुजोरा पाकिस्तानी लष्कराने दिला; मात्र या बॉम्बने विनाशक परिणाम साधला नाही, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा पाकिस्तानने प्रतिकार केला. तेव्हा या फायटर जेटनी परतीच्या मार्गावर असताना हे बॉम्ब टाकले असं पाक लष्कराचं म्हणणं आहे. लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले, 'पाकिस्तान भारताला एक 'सरप्राइज' देणार आहे. कुटनीती, राजकारण आणि लष्कर या तीन्ही माध्यमातून पाकिस्तान प्रत्युत्तर देईल.' भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाईहद्दीत अवघी ४ मिनिटे होती आणि पाकिस्तानी विमानांनी प्रत्युत्तर दिल्यावर ती माघारी गेली, असा दावा गफूर यांनी केला.
दरम्यान, 'आता कोणत्याही शक्यतेसाठी तयार राहा', अशी सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि सर्वसामान्य जनतेला केली आहे. आता भारताने आमच्या प्रत्युत्तराची वाट पाहण्याची वेळ आली आहे. आम्ही निर्णय घेतला आहे. वाट पाहा, असं गफूर म्हणाले.
भारताने मंगळवारी पहाटे नियंत्रण रेषेपासून ८० कि.मी.वर पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे मोठे प्रशिक्षण कॅम्प बॉम्बहल्ला करून उद्धवस्त केले. यात मोठ्या संख्येने दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, कमांडर्स ठार झाले. त्यानंतर काही तासांनी गफूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारत 'सरप्राइज' देण्यात अयशस्वी ठरला, असा दावा गफूर यांनी केला आहे. 'आम्ही तयार होतो, पण आश्चर्य वाटले नाही. आता तुम्ही आमच्या सरप्राइजसाठी तयार राहा,' असा इशारा त्यांनी दिला.
भारताच्या लढाऊ विमानांनी एका ऑपरेशनच्या वेळी चार बॉम्ब फेकले असा दुजोरा पाकिस्तानी लष्कराने दिला; मात्र या बॉम्बने विनाशक परिणाम साधला नाही, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा पाकिस्तानने प्रतिकार केला. तेव्हा या फायटर जेटनी परतीच्या मार्गावर असताना हे बॉम्ब टाकले असं पाक लष्कराचं म्हणणं आहे.
दरम्यान, 'आता कोणत्याही शक्यतेसाठी तयार राहा', अशी सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि सर्वसामान्य जनतेला केली आहे. आता भारताने आमच्या प्रत्युत्तराची वाट पाहण्याची वेळ आली आहे. आम्ही निर्णय घेतला आहे. वाट पाहा, असं गफूर म्हणाले.
भारताने मंगळवारी पहाटे नियंत्रण रेषेपासून ८० कि.मी.वर पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे मोठे प्रशिक्षण कॅम्प बॉम्बहल्ला करून उद्धवस्त केले. यात मोठ्या संख्येने दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, कमांडर्स ठार झाले. त्यानंतर काही तासांनी गफूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारत 'सरप्राइज' देण्यात अयशस्वी ठरला, असा दावा गफूर यांनी केला आहे. 'आम्ही तयार होतो, पण आश्चर्य वाटले नाही. आता तुम्ही आमच्या सरप्राइजसाठी तयार राहा,' असा इशारा त्यांनी दिला.