अ‍ॅपशहर

नोटाबंदीच्या निर्णयाचं राष्ट्रपतींकडून कौतुक

पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइकबाबत मतमतांतरं असताना, तसंच, देशातील नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठली असताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरकारच्या या दोन्ही निर्णयाचं आज भरभरून कौतुक केलं. नोटाबंदी हा काळा पैशाविरोधातील धाडसी निर्णय असून सर्जिकल स्ट्राइकमुळं सीमेपलीकडील घुसखोरीला चोख प्रत्युत्तर असल्याचं मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Times 31 Jan 2017, 1:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम surgical strikes a befitting reply to cross border terror president
नोटाबंदीच्या निर्णयाचं राष्ट्रपतींकडून कौतुक


पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइकबाबत मतमतांतरं असताना, तसंच, देशातील नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठली असताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरकारच्या या दोन्ही निर्णयाचं आज भरभरून कौतुक केलं. नोटाबंदी हा काळा पैशाविरोधातील धाडसी निर्णय असून सर्जिकल स्ट्राइकमुळं सीमेपलीकडील घुसखोरीला चोख प्रत्युत्तर असल्याचं मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात झाली. अनेक वर्षांची परंपरा खंडित करून मोदी सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिना आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संदर्भ देत राष्ट्रपतींनी हे अधिवेशन ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. आपल्या भाषणात राष्ट्रपती मुखर्जी यांनी सरकारच्या विकासकामांचा व देशवासीयांसाठी सरकारनं आणलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला. सरकारच्या विविध योजना या 'सबका साथ, सबका विकास'चं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा १३ कोटी लोकांना फायदा झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी १ लाखांहून अधिक बँक मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकांतून कर्ज न मिळू शकणाऱ्या लोकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देतानाच, आमचं सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे,' असंही मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपतींच्या भाषणातील ठळक मुद्दे:

>> देशात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असून त्यावर व्यापक चर्चा करण्याचीही तयारी आहे.

>> गेल्या चार दशकांपासून भारत दहशतवादाचा सामना करतो आहे. आमचं सरकार त्याविरोधात ठोस पावलं उचलत आहे. दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देण्यासाठी अन्य राष्ट्रांसोबत चर्चा सुरू आहे.
>> गेल्या काही दिवसांत ईशान्य भारतातील हिंसाचारात घट झाली आहे. या भागात रेल्वेचं जाळं वाढलं आहे.

>> दहशतवादाबरोबरच काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट चलनाला आळा घालण्यासाठी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज