अ‍ॅपशहर

गुजरातचा विजय हा 'हज'वरील 'राम'चा विजय: मोदी

'गुजरातमधील भाजपला मिळालेला विजय हा 'हज'वर 'राम'ला मिळालेला विजय आहे' अशा शब्दात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गुजरातमधील विजयाचे वर्णन केले आहे. काँग्रेस पक्षाने या निवणुकीला 'हज'च्या (हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश) आधारे जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. याच कारणामुळे काँग्रेसने गुजरात गमावल्याचे निदानही त्यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2017, 9:48 pm
पाटणा: 'गुजरातमधील भाजपला मिळालेला विजय हा 'हज'वर 'राम'ला मिळालेला विजय आहे' अशा शब्दात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गुजरातमधील विजयाचे वर्णन केले आहे. काँग्रेस पक्षाने या निवणुकीला 'हज'च्या (हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश) आधारे जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. याच कारणामुळे काँग्रेसने गुजरात गमावल्याचे निदानही त्यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushil modi speaks on verdict of himachal pradesh and gujarat election verdict
गुजरातचा विजय हा 'हज'वरील 'राम'चा विजय: मोदी


सुशील मोदी यांनी हार्दिकच्या नावाचे पहिले अक्षर 'एच', अल्पेशच्या नावाचा 'ए' आणि जिग्नेशच्या नावाचा 'जे' जोडून 'हज' हा शब्द तयार केला आहे. याबरोबरच त्यांनी विजय रुपाणी यांच्या नावातील 'आर', अमित शहा यांच्या नावातील 'ए' आणि पंतप्रधान मोदी यांच्या नावातील 'एम' ही अक्षरे जोडून राम हा शब्द तयार केला आहे.

'काँग्रेसने विकास या मुद्द्याची उडवली टर'

गुजरात निवडणुकीतील विजय हा 'हज'वर 'राम'ने मिळवलेला विजय असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, दोन्ही राज्यांमधील निवडणूक निकालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणावर शिक्कामोर्तब केल्याचे सिद्ध केले आहे. 'विकास पागल हो गया है', अशा वक्तव्ये करत काँग्रेसने विकासाच्या विचाराची टर उडवली. तर, भाजपने 'मैं ही विकास हूँ'. अर्थात जिथे भाजप आहे तिथे विकास आहे असे म्हटले होते याची आठवण मोदी यांनी करून दिली.

'आता लालू देतील ईव्हीएमला दोष'

काँग्रेसने गुजरातमधील सर्व व्यापारी केंद्रांवर नोटाबंदी आणि जीएसटी हे निवडणुकीचे मुद्दे बनवले होते. परंतु, या सर्व भागांमध्ये भाजपचाच विजय झाला आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. गुजरात निवडणुकीदरम्यान आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले की, लालूप्रसाद कधी गुजरातमध्ये गेले नाहीत, परंतु इथेच बसून ते यदुवंशीयांना ललकारत होते. मात्र यदुवंशीयांनी भाजपलाच आपला एकहाती कौल देत लालूप्रसाद यादवांना नाकारले आहे याचा मला आनंद आहे. मला ठाऊक आहे की आता लालू हे ईव्हीएमलाच दोष देतील असा टोलाही मोदी यांनी लालूंना लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज