नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत एक चूक केली. या चुकीच्या माहितीबद्दल त्यांनी नंतर माफीही मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच आपल्या नेपाळ दौऱ्यात जनकपूरमध्ये लाखो 'भारतीयां'समोर भाषण केलं, असं सुषमा म्हणाल्या. प्रत्यक्षात मोदींनी नेपाळी नागरिकांना संबोधित केलं होतं.
टि्वटरवरून आपल्या या चुकीबद्दल सुषमा यांनी माफी मागितली. 'ही माझ्याकडून झालेली चूक आहे. मी गांभीर्याने याबद्दल क्षमा मागते,' असं टि्वट त्यांनी केलं आहे. एनडीए सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या चार वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 'नरेंद्र मोदींच्या आधी एकाही पंतप्रधानाने इतक्या मोठ्या स्तरावर भारतीय प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही,' असं त्या म्हणाल्या.
नेपाळच्या खासदारांचा आक्षेप
सुषमांच्या या चुकीवर नेपाळच्या एका खासदाराने आक्षेप घेतला आहे. नेपाळी काँग्रेसचे नेते, खासदार गगन थापा यांनी या चुकीचा निषेध केला आहे.
टि्वटरवरून आपल्या या चुकीबद्दल सुषमा यांनी माफी मागितली. 'ही माझ्याकडून झालेली चूक आहे. मी गांभीर्याने याबद्दल क्षमा मागते,' असं टि्वट त्यांनी केलं आहे. एनडीए सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या चार वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 'नरेंद्र मोदींच्या आधी एकाही पंतप्रधानाने इतक्या मोठ्या स्तरावर भारतीय प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही,' असं त्या म्हणाल्या.
नेपाळच्या खासदारांचा आक्षेप
सुषमांच्या या चुकीवर नेपाळच्या एका खासदाराने आक्षेप घेतला आहे. नेपाळी काँग्रेसचे नेते, खासदार गगन थापा यांनी या चुकीचा निषेध केला आहे.