अ‍ॅपशहर

स्वराज यांच्या निधनानंतर स्मृती इराणींचं भावूक ट्विट

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही स्वराज यांच्या निधनानंतर भावूक ट्विट केलं आहे. दीदी, मला दिलेला शब्द न पाळताच तुम्ही सोडून गेलात, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 10:19 am
नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही स्वराज यांच्या निधनानंतर भावूक ट्विट केलं आहे. दीदी, मला दिलेला शब्द न पाळताच तुम्ही सोडून गेलात, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swaraj


सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानं देश एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी भावूक ट्विट केलं आहे. 'दीदी, माझी तुमच्याविषयी एक तक्रार आहे. तुम्ही बांसुरीला (सुषमा स्वराज यांची मुलगी)' सांगितलं होतं की एका चांगल्या हॉटेलात मला लंचसाठी घेऊन जा. पण दिलेला शब्द न पाळताच तुम्ही मला सोडून गेलात,' असं इराणी म्हणाल्या.



विरोधी पक्षनेत्या, केंद्रीय मंत्री, रणनीतीकार अशी पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठा व प्रयत्नपूर्वक पूर्ण करणाऱ्या स्वराज म्हणजे भाजपचा आधारवड होत्या. चार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या स्वराज यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदं भूषवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी परराष्ट्र मंत्रिपद भूषवलं होतं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या.

संबंधित बातम्या:

सुषमा स्वराज: मितभाषी पण कठोर परराष्ट्रमंत्री

वकील ते केंद्रीय मंत्री; सुषमा स्वराज यांचा प्रवास

'बिल' नाही बला: स्वराज यांचे प्रसिद्ध भाषण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज