अ‍ॅपशहर

बुरहानला हिरो बनवणाऱ्या पाकला खडे बोल

जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीचा प्रचार करून जगभरात भारताविरोधात कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुनावलं आहे. 'भारताच्या अंतर्गत प्रश्नांत ढवळाढवळ करणं पाकिस्ताननं बंद करावं,' असा इशारा स्वराज यांनी दिला आहे.

Maharashtra Times 11 Aug 2016, 5:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj warns pakistan against glorifying terrorism
बुरहानला हिरो बनवणाऱ्या पाकला खडे बोल


जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीचा प्रचार करून जगभरात भारताविरोधात कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुनावलं आहे. 'भारताच्या अंतर्गत प्रश्नांत ढवळाढवळ करणं पाकिस्ताननं बंद करावं,' असा इशारा स्वराज यांनी दिला आहे.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. 'दहशतवादी बुरहान वानीच्या खातम्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या देशातील विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा केली होती. भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकनं केला होता. या संदर्भात बोलताना स्वराज यांनी भारताच्या काश्मीरविषयीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मिरी लोक हे भारताचे नागरिक आहेत. भारत सरकारला त्यांच्याविषयीच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. पण तेथील दहशतवादाचं उदात्तीकरण आम्हाला मंजूर नाही. जगातील वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करून भारतानं हे पटवून दिलं आहे,' असं स्वराज यांनी सांगितलं.

'आंतरराष्ट्रीय पत्रकारांपुढंही भारतानं सुरक्षा दलाची बाजू मांडली आहे. जम्मू-काश्मीरमधील आंदोलकांच्या हल्ल्यात ३,७८०हून अधिक सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. तरीही सुरक्षा दलानं कसा संयम बाळगला हे सरकारनं ठासून सांगितल्याची माहिती स्वराज यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज