मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पृथ्वीवरील या स्वर्गाला दहशतवाद्यांचा स्वर्ग बनवण्याचा इरादा आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा गौरव करणे आणि हिंसा पसरवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आक्षेपार्ह असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी याला 'काश्मीरच्या स्वातंत्र्यलढयातील हुतात्मा' घोषित करत १९ जुलै हा 'काळा दिवस' म्हणून पाळणाऱ्या पाकिस्तानला भारताने जोरदार उत्तर दिले. सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला. बुरहान वानी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता. त्याने अनेक लोकप्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या केली होती आणि त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षिस होते, ही माहिती शरीफ यांना नव्हती का?, असा सवाल स्वराज यांनी विचारला.
‘काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत,’ असे दिवास्वप्न पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकांत नवाझ शरीफ गटाच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने विजय मिळवल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये शरीफ यांनी शुक्रवारी हे मत व्यक्त केले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग सत्तेवर येणार आहे.
#WATCH: External Affairs Minister Sushma Swaraj speaks on Pakistan and Pakistan PM Nawaz Sharif.https://t.co/yTZcNXqk3v — ANI (@ANI_news) July 23, 2016
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पृथ्वीवरील या स्वर्गाला दहशतवाद्यांचा स्वर्ग बनवण्याचा इरादा आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा गौरव करणे आणि हिंसा पसरवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आक्षेपार्ह असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी याला 'काश्मीरच्या स्वातंत्र्यलढयातील हुतात्मा' घोषित करत १९ जुलै हा 'काळा दिवस' म्हणून पाळणाऱ्या पाकिस्तानला भारताने जोरदार उत्तर दिले. सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला. बुरहान वानी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता. त्याने अनेक लोकप्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या केली होती आणि त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षिस होते, ही माहिती शरीफ यांना नव्हती का?, असा सवाल स्वराज यांनी विचारला.
‘काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत,’ असे दिवास्वप्न पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकांत नवाझ शरीफ गटाच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने विजय मिळवल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये शरीफ यांनी शुक्रवारी हे मत व्यक्त केले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग सत्तेवर येणार आहे.
#WATCH: External Affairs Minister Sushma Swaraj speaks on Pakistan and Pakistan PM Nawaz Sharif.https://t.co/yTZcNXqk3v — ANI (@ANI_news) July 23, 2016