अ‍ॅपशहर

'ममता 'बेगम' पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनवतील'

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान गेल्या आठवड्यात झालं. आता या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2021, 7:42 pm
कोलकाताः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजप नेते आणि नंदीग्राममधील उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी ममता बॅनर्जींवर मुस्लिम धार्जिणे असल्याचा आरोप केला. बेगम ममता बॅनर्जी मुस्लिमांसाठी पश्चिम बंगालचा 'मिनी पाकिस्तान' बनवतील, असा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Suvendu Adhikari
'ममता 'बेगम' पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनवतील', सुवेंदूंची टीका, दीदींचा पलटवार


सुवेंदू अधिकारी यांच्या आरोपावर ममता बॅनर्जींनीही पलटवार केला आहे. सुवेंदू अधिकारींनी यूपी-बिहारचे गुंड बोलावले आहेत. पण मी रॉयल बंगाल टायगर आहे आणि मी वाघिणीसारखंच उत्तर देईन, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

bjp candidate : पोटनिवडणुकांसाठी भाजपची यादी; महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंडमधील उमेदवारांची घोषणा

ममता बॅनर्जांनी 'ईद मुबारक' म्हणण्याची सवय आहे. यामुळे त्यांनी होळीच्या शुभेच्छा देतानाही 'होली मुबारक' म्हटलं आहे. बेगमला मत देऊ नका. तुम्ही बेगमला मत देणार तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम सुफियाना शिवाय इतर कुणाला ओळखत नाही. बेगम अचानक बदलल्या आणि मंदिरांमध्ये जाऊ लागल्या. कारण त्यांना पराभवाची भीती वाटतेय, अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये केली.

हाथरसवर अमित शहा गप्प का होते? ममतांचा बोचरा सवाल

भाजप कार्यकर्त्याच्या आईचे निधन, TMC वर मारहाणीचा आरोप

'ममता आधी कारने फिरायच्या आता हेकॉप्टरने फिरतात'

ममता बॅनर्जी आधी कारमधून प्रचारसभांसाठी फिरायच्या. मात्र आता त्या हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत. आता ब्रँडेड बुट घालतात. आधी त्या ४०० रुपयांची साडी नेसायच्या. पण आता ६ हजारांची साडी नेसतात. पण आपल्यात कुठलाही बदल झालेला नाही. २००४ मध्ये जे आपण कपडे घालत होतो, तसेच आपण आताही घालतो. यामुळे जनतेने 'बेगम' आणि 'मुलगा, भाऊ-मित्र' यापैकी कुणाला एकाला निवडायचं आहे, असं सुवेंदू अधिकरी म्हणाले.

ममतांनी सुवेंदू अधिकारींच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. गुरुवारी मतदान होईपर्यंत आपण नंदीग्राममध्येच राहू. तसंच सुवेंदू अधिकारींचे नाव न घेता ममतांनी टीका केली. जास्त लालच चांगलं नसतं. ते ना घरचे राहतील ना घाटाचे, असं ममता बॅनर्जी बोलल्या.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मंगळवारी नंदीग्राममध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहा हे रोडशोमध्येही भाग घेतली, असं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज