अ‍ॅपशहर

'मायावती देश सोडून पळण्याच्या तयारीत'

'मायावती यांनी निवडणुकीची तिकीटं विकून प्रचंड माया जमवली आहे. तब्बल ५० कंपन्यांमध्ये त्यांनी २ हजार कोटी रुपये गुंतवले असून विजय मल्ल्याप्रमाणेच त्या देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत,' असा घणाघाती आरोप बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

Maharashtra Times 2 Jul 2016, 12:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swami prasad maurya attacks mayawati
'मायावती देश सोडून पळण्याच्या तयारीत'


'मायावती यांनी निवडणुकीची तिकीटं विकून प्रचंड माया जमवली आहे. तब्बल ५० कंपन्यांमध्ये त्यांनी २ हजार कोटी रुपये गुंतवले असून विजय मल्ल्याप्रमाणेच त्या देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत,' असा घणाघाती आरोप बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

गोमतीनगर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 'मायावती यांनी बाबासाहेबांचं मिशन व दलितांच्या मतांचा सौदा करून पैसा कमावत आहे. बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या काळात पक्षाच्या प्रत्येक विभागाचे अध्यक्षपद व सरचिटणीसपद दलित व मागासांना दिले जायचे. दलित व गरिबांना राजकारणाबाहेर फेकण्याचा त्यांचा अजेंडा नव्हता. पण मायावतींना आता कार्यकर्त्यांची गरजच राहिलेली नाही. पक्षाचे मध्यस्थ पैसेवाल्यांना शोधून मायावतींपुढं उभे करतात. माफिया आणि धनदांडग्यांकडून पैसा घेऊन त्यांनाच तिकीट दिले जाते. दलितांच्या हिताशी मायावतींचं काहीएक देणंघेणं नाही. त्यांना स्वत:ची तिजोरी भरून फरार व्हायचं आहे,' असा आरोप मौर्य यांनी केला.

'निवडणुकीचं तिकीटवाटप करताना मायावती दलितांनाही सोडत नाहीत. त्यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतले जातात. जिल्हा व पंचायत निवडणुकांतही दलितांकडून अडीच लाख रुपये घेतले गेले. आमच्यावर गद्दारीचा आरोप करणाऱ्या मायावती महागद्दार आहेत. त्यांनी बाबासाहेब व कांशीराम यांचं मिशन विकून टाकलं आहे,' असंही मौर्य म्हणाले. मायावतींकडे उमेदवारी मागणाऱ्यांनी सावध राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज