नवी दिल्ली : शांततेसाठी चर्चा करण्यास आमचा नकार नाही, पण दहशतवाद सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही. जोपर्यंत दहशतवादी येत राहणार तोपर्यंत आम्ही त्यांना मारत राहणार , असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं. चीन आणि पाकिस्तानी सीमांवर उत्तम पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. रावत वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. तेथील शांततेसाठी आम्ही केवळ समन्वयक आहोत.' अफगाणिस्तानमधील तालिबान्यांशी अमेरिका आणि रशियाच्या चर्चेवरदेखील रावत यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, 'ती परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये होऊ शकत नाही. येथे आमच्या अटींवरच चर्चा होईल.'
चर्चा आणि दहशतवाद एका वेळी होऊ शकत नाही, हे जम्मू-काश्मीरलाही लागू आहे, असेही रावत म्हणाले. वाढलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत रावत म्हणाले, 'जर कोणी बेकायदेशीर पद्धतीने सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर तत्काळ गोळीबार सुरू होतो. यामुळेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.'
ते म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. तेथील शांततेसाठी आम्ही केवळ समन्वयक आहोत.' अफगाणिस्तानमधील तालिबान्यांशी अमेरिका आणि रशियाच्या चर्चेवरदेखील रावत यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, 'ती परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये होऊ शकत नाही. येथे आमच्या अटींवरच चर्चा होईल.'
चर्चा आणि दहशतवाद एका वेळी होऊ शकत नाही, हे जम्मू-काश्मीरलाही लागू आहे, असेही रावत म्हणाले. वाढलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत रावत म्हणाले, 'जर कोणी बेकायदेशीर पद्धतीने सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर तत्काळ गोळीबार सुरू होतो. यामुळेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.'