नवी दिल्ली: तेलुगू देसम पार्टी आणि भाजप दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर शरसंधान साधलं आहे. 'एनडीएतील घटकपक्षांचे भाजपबरोबर सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. हळूहळू इतर पक्षही तक्रारी करू लागतील आणि एक-एक करून सर्व पक्ष एनडीएतून बाहेर पडतील,' असं सांगतानाच आमच्याकडून प्रेरणा घेतल्यानेच टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
तेलुगू देसम (टीडीपी) आणि भाजपमधील संबंध ताणल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा दावा केला. 'एनडीएतील सर्वच घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे इतर पक्षांची नाराजी लवकरच बाहेर येईल,' असं संजय राऊत यांनी सांगितलं. तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू केंद्रातील भाजप सरकारमधून बाहेर पडतील, हे अपेक्षितच होतं, असंही त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या तेलुगू देसम पक्षाने 'एनडीए'पासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असून त्याला उत्तर म्हणून भाजपचे मंत्रीही आंध्रप्रदेश सरकारमधून बाहेर पडले आहेत.
तेलुगू देसम (टीडीपी) आणि भाजपमधील संबंध ताणल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा दावा केला. 'एनडीएतील सर्वच घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे इतर पक्षांची नाराजी लवकरच बाहेर येईल,' असं संजय राऊत यांनी सांगितलं. तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू केंद्रातील भाजप सरकारमधून बाहेर पडतील, हे अपेक्षितच होतं, असंही त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या तेलुगू देसम पक्षाने 'एनडीए'पासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असून त्याला उत्तर म्हणून भाजपचे मंत्रीही आंध्रप्रदेश सरकारमधून बाहेर पडले आहेत.