मदुराई:
केस गळतीच्या समस्येमुळं त्रस्त झालेल्या २७ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणानं रविवारी घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मदुराईतील जयहिंदपुरम येथे ही घटना घडली. आर. मिथुन राज असं या तरुणाचं नाव आहे.
आर. मिथुन राज हा बेंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 'त्याच्या डोक्यावरील त्वचेच्या विकारामुळे केस गळती सुरू झाली होती. त्याने अनेक औषधोपचार केले. मात्र, केस गळती थांबली नाही. केस गळतीमुळे तो निराशेच्या गर्तेत सापडला होता. काही आठवड्यांपासून याच चिंतेने तो तणावात होता. अखेर रविवारी घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याची आई वासंती मंदिरातून घरी परतली. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून रिक्षातून रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' जयहिंदपुरम पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
चेन्नईत इन्फोसिसमधून आर. मिथुन राज याने करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षे तिथे नोकरी केल्यानंतर तो गेल्या वर्षीच बेंगळुरूतील कंपनीत नोकरीला लागला. काही वर्षांपूर्वीच त्याचे वडील रवी यांचे निधन झाले आहे. तरुण मुलगा गमावल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
केस गळतीच्या समस्येमुळं त्रस्त झालेल्या २७ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणानं रविवारी घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मदुराईतील जयहिंदपुरम येथे ही घटना घडली. आर. मिथुन राज असं या तरुणाचं नाव आहे.
आर. मिथुन राज हा बेंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 'त्याच्या डोक्यावरील त्वचेच्या विकारामुळे केस गळती सुरू झाली होती. त्याने अनेक औषधोपचार केले. मात्र, केस गळती थांबली नाही. केस गळतीमुळे तो निराशेच्या गर्तेत सापडला होता. काही आठवड्यांपासून याच चिंतेने तो तणावात होता. अखेर रविवारी घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याची आई वासंती मंदिरातून घरी परतली. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून रिक्षातून रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' जयहिंदपुरम पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
चेन्नईत इन्फोसिसमधून आर. मिथुन राज याने करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षे तिथे नोकरी केल्यानंतर तो गेल्या वर्षीच बेंगळुरूतील कंपनीत नोकरीला लागला. काही वर्षांपूर्वीच त्याचे वडील रवी यांचे निधन झाले आहे. तरुण मुलगा गमावल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.