म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाकव्याप्त काश्मीरमधले तुर्तुक हे गाव १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराने भारतात सामिल करून घेतले. भारतीय लष्कराच्या सौहादपूर्ण वागणुकीमुळे पुढे कारगिलच्या युद्धात गावकऱ्यांनी लष्कराला मदतही केली. मात्र, भारतात येऊनही दुर्गमतेमुळे प्रगतीसाठी अडलेल्या या गावाला जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जापेक्षाही 'भारतीय प्रशासना'त असण्याची गरज जाणवली आणि 'मोदीजी को कहों हमे कुबुल करे' अशी साद या गावाने घातली होती. जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश होण्याचा मार्ग खुला झाल्याने या गावाने आता प्रगतीपथाची आस धरली आहे.
लेहहून डिस्कीत, ह्युंडर, थोईसे, चांगमार आणि बुकडांगमार्गे तुर्तुकला जाता येते. त्यासाठी लेह इथल्या टूरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरहून परवानगी घेऊन खारदुंगला पासमार्गे तुर्तुकचा प्रवास सुरू होतो. लेहहून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावरचे हे गाव भारतीय लष्कराने गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून आज या गावाकडे पाहिले जाते. पूर्वीच्या बाल्टिस्तान राजवंशाचे प्रतिनिधी याबगो महंमद खान यांनी या गावातल्या त्यांच्या वाड्यात संग्रहालय थाटले आहे. ते म्हणतात, 'जन्म आणि प्राथमिक शिक्षक पाकव्याप्त काश्मीरात, तर माझे तरुण्यापासून पुढचा प्रवास हा स्वतंत्र भारतात झाला आहे. भारतीय लष्कराला केलेल्या सहकार्याबद्दल मला पदकेही मिळाली आहेत. मात्र, गाव भारतात येऊनही दुर्गमतेमुळे असणाऱ्या अडचणी अद्याप कायम आहेत. आमच्या अपेक्षांची पूर्ती मोदी सरकारने करावी अशी अपेक्षा आहे, कारण आता आम्ही भारतीय आहोत. आम्हाला त्यांनी आपलेपणाने कुबुल करावे.' अशीच अपेक्षा या गावातील हॉटेल व्यावसायिक हैदर खान या तरुणाने व्यक्त केली. आज आम्ही भारतात आहोत आणि आमची प्रगती पाहून पाकिस्तानातल्या नातेवाईकांना आमचा हेवा वाटतो. मोदी सरकारचा हा निर्णय आश्वासक वाटतो, अशा शब्दांमध्ये हैदरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
.....
पाकव्याप्त काश्मीरमधले तुर्तुक हे गाव १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराने भारतात सामिल करून घेतले. भारतीय लष्कराच्या सौहादपूर्ण वागणुकीमुळे पुढे कारगिलच्या युद्धात गावकऱ्यांनी लष्कराला मदतही केली. मात्र, भारतात येऊनही दुर्गमतेमुळे प्रगतीसाठी अडलेल्या या गावाला जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जापेक्षाही 'भारतीय प्रशासना'त असण्याची गरज जाणवली आणि 'मोदीजी को कहों हमे कुबुल करे' अशी साद या गावाने घातली होती. जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश होण्याचा मार्ग खुला झाल्याने या गावाने आता प्रगतीपथाची आस धरली आहे.
लेहहून डिस्कीत, ह्युंडर, थोईसे, चांगमार आणि बुकडांगमार्गे तुर्तुकला जाता येते. त्यासाठी लेह इथल्या टूरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरहून परवानगी घेऊन खारदुंगला पासमार्गे तुर्तुकचा प्रवास सुरू होतो. लेहहून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावरचे हे गाव भारतीय लष्कराने गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून आज या गावाकडे पाहिले जाते. पूर्वीच्या बाल्टिस्तान राजवंशाचे प्रतिनिधी याबगो महंमद खान यांनी या गावातल्या त्यांच्या वाड्यात संग्रहालय थाटले आहे. ते म्हणतात, 'जन्म आणि प्राथमिक शिक्षक पाकव्याप्त काश्मीरात, तर माझे तरुण्यापासून पुढचा प्रवास हा स्वतंत्र भारतात झाला आहे. भारतीय लष्कराला केलेल्या सहकार्याबद्दल मला पदकेही मिळाली आहेत. मात्र, गाव भारतात येऊनही दुर्गमतेमुळे असणाऱ्या अडचणी अद्याप कायम आहेत. आमच्या अपेक्षांची पूर्ती मोदी सरकारने करावी अशी अपेक्षा आहे, कारण आता आम्ही भारतीय आहोत. आम्हाला त्यांनी आपलेपणाने कुबुल करावे.' अशीच अपेक्षा या गावातील हॉटेल व्यावसायिक हैदर खान या तरुणाने व्यक्त केली. आज आम्ही भारतात आहोत आणि आमची प्रगती पाहून पाकिस्तानातल्या नातेवाईकांना आमचा हेवा वाटतो. मोदी सरकारचा हा निर्णय आश्वासक वाटतो, अशा शब्दांमध्ये हैदरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
.....