अ‍ॅपशहर

अलाहाबाद धुमसतेच

कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी अलाहाबाद विश्वविद्यालय परिसरात एक बस पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Maharashtra Times 13 Feb 2018, 4:08 pm
वृत्तसंस्था, अलाहाबाद

कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी अलाहाबाद विश्वविद्यालय परिसरात एक बस पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

कायद्याचा विद्यार्थी असलेला २६ वर्षीय दिलीप सरोज शुक्रवारी आपल्या दोन मित्रांसोबत कर्नलगंज येथील एका हॉटेलात जेवण्यासाठी गेला होता. तिथे एका महागड्या गाडीतून आलेल्या काही जणांसोबत त्यांचा वाद झाला व त्यानंतर त्यांनी दिलीपला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो कोमात गेला होता व रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बस पेटवून दिली व जिल्हाधिकारी सुहास एल. वाय. यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दिलीपच्या हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची आश्वासन देत दोन आरोपींना सोमवारी सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुलहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय सिंहचे साथीदार जी. एस. अवस्थी आणि कारचा चालक रामदीन मौर्य यांना अटक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज