अ‍ॅपशहर

‘दहशतवाद अंतिम टप्प्यात’

गेले काही महिने आणि आठवड्यांमध्ये राबविलेल्या कठोर उपायांमुळे काश्मीरमधील दहशतवाद हा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी बुधवारी केला. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.

Maharashtra Times 13 Jul 2017, 3:00 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorism at final stage says jitendra singh
‘दहशतवाद अंतिम टप्प्यात’


गेले काही महिने आणि आठवड्यांमध्ये राबविलेल्या कठोर उपायांमुळे काश्मीरमधील दहशतवाद हा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी बुधवारी केला. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह आणि गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने बुधवारी जम्मू-काश्मीरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर जितेंद्रसिंह म्हणाले, ‘गेले काही आठवडे सुरू असलेल्या कठोर कारवाईने मार्ग निघाल्याचे दिसत आहे. देशाच्या अन्य भागांतही दहशतवाद संपुष्टात आला असून, त्याचप्रमाणे काश्मीरमधील दहशतवादही हद्दपार होईल. हा दहशतवाद सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे वाटत आहे.’

‘जम्मू-काश्मीरबाबत लवकरच अंतिम तोडगा काढण्यात येईल,’ असे विधान गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले होते. त्यावर विचारले असता, ‘अंतिम तोडग्याचा अर्थ विविध घटकांकडून विविध पद्धतींनी लावला जात आहे. दहशतवाद आणि हिंसाचार संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहे, असा याचा अर्थ आहे. परिस्थिती चांगली होण्यासाठी नागरी समाज आणि सुरक्षा दलांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. सुरक्षा दलांशिवाय नागरी समाज अस्तित्वात राहणार नाही, अशी आजची स्थिती आहे. सुरक्षा दलेही गेली २५ वर्षे संयम ठेवत आहेत. तसा ठेवायला लागणार आहे हे त्यांनाही ठाऊक आहे,’ असे जितेंद्रसिंह म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज