अ‍ॅपशहर

‘संतांच्या वेशात येऊ शकतात दहशतवादी’

राम मंदिर आणि धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी आयोध्या सध्या चर्चेत आहे. इथे आज, रविवारी होणाऱ्या संतांच्या धर्मसभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर संस्थेचे उत्तर प्रदेश पोलिसांना दिला आहे. हे दहशतवादी संतांच्या वेशात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Times 25 Nov 2018, 4:23 am
एनबीटी वृत्त, लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorist may come under the authority of a sadhu
‘संतांच्या वेशात येऊ शकतात दहशतवादी’


राम मंदिर आणि धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी आयोध्या सध्या चर्चेत आहे. इथे आज, रविवारी होणाऱ्या संतांच्या धर्मसभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर संस्थेचे उत्तर प्रदेश पोलिसांना दिला आहे. हे दहशतवादी संतांच्या वेशात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुप्तचर संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. एटीएस कमांडोंव्यतिरिक्त जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले असून, आयोध्या व आजूबाजूच्या जिल्ह्यांतील धर्मशाळा, हॉटेल आणि गेस्ट हाऊसची कसून चौकशी केली जात आहेत. डीजीपी मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे आठवडाभरापूर्वी गुप्तचर संस्थेचा अॅलर्ट आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोध्या व परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवादी संतांच्या वेशात गर्दीचा फायदा घेऊन हल्ला करू शकतात. त्यामुळे जे दहशतवादी किंवा संशयित येण्याची शक्यता आहे, त्यांची छायाचित्रे व तपशील गुप्तचर विभागाची पथके व विशेष दलाची पथकांना देण्यात आला आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने धर्मसभेत येणाऱ्या प्रत्येकांची संपूर्ण माहिती संकलित केली असून, ती सेवेवर असलेले अधिकारी व डीजीपी मुख्यालयाला देण्यात आली आहे. रविवारी आयोध्येत येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाणार आहे. यावेळी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

गोध्राकांडाच्या पुनरावृत्तीची शंका

महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांच्या परतीच्या कार्यक्रमात झालेल्या बदलामुळे सुरक्षायंत्रणांचा तणाव वाढला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शिवसैनिक २५ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता आयोध्या-नाशिक विशेष गाडीने राज्यात परतणार होते; परंतु अचानक २४ नोव्हेंबरला रात्री ११च्या गाडीने परतण्याबाबत रेल्वेला पत्र देण्यात आले आहे. रेल्वेनेही त्यांची मागणी मान्य केली आहे. ही गाडी रात्री उत्तर प्रदेशमधील अनेक स्थानकांतून जाणार असल्याने २००२मधील गोध्रा हत्याकांडासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ही गाडी थांबणाऱ्या सर्वच स्थानकांवर विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज