वृत्तसंस्था, झाशी
आगरा येथून कोइम्बतूरकडे निघालेल्या केरळ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या चौघा यात्रेकरूंचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात उत्तर-मध्य रेल्वेच्या झाशी विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंग यांनी सांगितले की, या चौघांच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. हे चौघे यात्रेकरूंच्या एका चमूत होते. हा चमू तीर्थयात्रेला निघाला होता. चमूतील सर्व वाराणसीहून आगरा येथे गेले आणि त्यानंतर ते केरळ एक्सप्रेसने कोइम्बतूरला परतत असताना ही घटना घडली. मरण पावलेल्या चौघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
गाडीमध्ये हे प्रवासी बिगर वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. या सर्वांना सोमवारी सायंकाळच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. झाशीला गाडी येईपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. चौथ्या प्रवाशाला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. बुंदेलखंड प्रदेशात झाशी येत असून, या भागात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच अतिउष्णतेमुळे या प्रवाशांचा मृत्यू झाला असावा, असे डब्यांतील अन्य प्रवाशांचे म्हणणे आहे.
मृत चौघा प्रवाशांचे पार्थिव विशेष मालवाहू व्हॅनमधून कोइम्बतूरला पाठवले गेले आहे. चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे मनोज कुमार सिंग यांचे म्हणणे आहे.
आगरा येथून कोइम्बतूरकडे निघालेल्या केरळ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या चौघा यात्रेकरूंचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात उत्तर-मध्य रेल्वेच्या झाशी विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंग यांनी सांगितले की, या चौघांच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. हे चौघे यात्रेकरूंच्या एका चमूत होते. हा चमू तीर्थयात्रेला निघाला होता. चमूतील सर्व वाराणसीहून आगरा येथे गेले आणि त्यानंतर ते केरळ एक्सप्रेसने कोइम्बतूरला परतत असताना ही घटना घडली. मरण पावलेल्या चौघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
गाडीमध्ये हे प्रवासी बिगर वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. या सर्वांना सोमवारी सायंकाळच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. झाशीला गाडी येईपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. चौथ्या प्रवाशाला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. बुंदेलखंड प्रदेशात झाशी येत असून, या भागात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच अतिउष्णतेमुळे या प्रवाशांचा मृत्यू झाला असावा, असे डब्यांतील अन्य प्रवाशांचे म्हणणे आहे.
मृत चौघा प्रवाशांचे पार्थिव विशेष मालवाहू व्हॅनमधून कोइम्बतूरला पाठवले गेले आहे. चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे मनोज कुमार सिंग यांचे म्हणणे आहे.